वाई:-सिद्धनाथवाडी वाई गुरेबाजार रहिवाशी संकुलातील नागरिक सोसतायत मरण यातना.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी आशितोष चव्हाण
वाई:-सिद्धनाथवाडी वाई गुरेबाजार रहिवाशी संकुलातील नागरिक सोसतायत मरण यातना.
दि:- 9 प्रतिनिधी वाई
वाई नगपरिषदे ने सिद्धनाथ वाडी गुरेबाजार या भागातील रहिवाशांना संकुल बांधुन दिले आहे. मुळातच या बांधकामात मोठ्या प्रमाणावर दोष आहेत. ईमारतीचे ड्रेनेज पाण्याची व सांडपाण्याची व्यवस्था कुचकामी ठरत आहे. मैल्याचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ड्रेनेज टाकीतून पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांना मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व नगरपरिषदेस वारंवार कळवून त्यांचे कडुन कोणतीही उपाययोजना होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ईमारतीस संरक्षण भिंत नसल्याने व मैल्याचे पाणी ईमारतीच्या आवारात मुरत असल्याने ईमारतीस धोका निर्माण झाला आहे. एवढी गंभीर बाब असुनही नगरपरिषद दुर्लक्ष करत आहे. या भागात साथीचे आजार पसरुन माणसे मरण्याची वाट लोकप्रतिनिधी पाहत आहेत का? असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे. नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणारे लोकप्रतिनिधी व नगरपरिषद यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून नगपरिषदेने जाबदारिने वागल पाहीजे नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देउन तातडीने दुर्गंध युक्त पाण्याची विल्हेवाट लावली पाहीजे. याची संपूर्ण जबाबदारी नगरषरिषदेची आहे. असे वक्तव्य नागरिकांनी केले आहे.