सातारा:-शासकीय ,निमशासकीय कार्यालये , बँका ,शाळा , महाविद्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणे अनिवार्य- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आदेश.
प्रतिनिधी प्रमोद देवाडिगा सातारा:-9623714741

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी प्रमोद देवाडीगा (सातारा जिल्हाध्यक्ष)
सातारा:- दिनांक 3 – राज्यात वाढत असलेल्या सिझनल इन्फ्लूएन्झा आजार आणि कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक पूर्वतयारी व उपाययोजना राबविण्याविषयी सचिव ,सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय ,निमशासकीय , कार्यालये, बँका , शाळा महाविद्यालये यामधील सर्व शासकीय अधिकारी ,कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी जसे आठवडी बाजार ,एसटी स्टँड परिसर ,यात्रा ,मेळावे लग्नसमारंभ ,मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येण्याचे ठिकाणे या सर्व ठिकाणी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा. सामाजिक अंतर राखून वेळोवेळी सॅनिटायझर चा वापर करावा.असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री जयवंशी यांनी केले आहे.