सातारा:-मनुष्य जीवनाचा खरा अर्थ कळण्यासाठी गुरुची आवश्यकता___गुरु औंधकर महाराज.
पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा
मनुष्य जीवनाचा खरा अर्थ कळण्यासाठी गुरुची आवश्यकता___गुरु औंधकर महाराज.
मायणी प्रतिनिधी__पृथ्वीवर भूगोल आहे व आकाशात खगोल आहे या दोन्ही घटनांची जोडणारा दुवा म्हणजे गुरु आहे मनुष्य जीवनाचा खरा अर्थ कळण्यासाठी गुरुची आवश्यकता असते व मनुष्य जीवनातील कर्तव्य समजून घेण्यासाठी व मोक्ष प्राप्तीसाठी गुरुच मार्गदर्शन करत असतो त्यामुळे या जगात गुरूला अनन्य साधारण महत्व आहे गुरु शिष्याला संस्कार ,साधना ,अनुभूती देत असतो म्हणून प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनातील कर्तव्य समजून घेण्याची गरज आहे त्यासाठी गुरुचरणाशी लीन होणे गरजेचे आहे असे स्पष्ट मत औंधकर मठाचे मठाधिपती गुरुगंगाधर शिवाचार्य प्रभुलिंग स्वामी औंधकर यांनी मायणी येथील मुनी महाराज
मठात भक्त समुदायासमोर बोलताना व्यक्त केली. या मठांमध्ये पारंपारिक पौर्णिमा साजरी करण्यात येते यावर्षीही अत्यंत भक्ती भावाने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. सकाळी गुरू महाराजांची पाद्यपूजा गुरुवंदना शिव दीक्षा या कार्यक्रमासोबत सकाळी गुरू समाधीस रुद्राभिषेक 9 ते 11 रिक्षा ११ ते १२ गुरुवंदना गुरुपाद्यपूजा महामंगल आरती या धार्मिक कार्यक्रमाबरोबर महाराजांचे आशीर्वचन इत्यादी कार्यक्रम भावपूर्ण व भक्तिपूर्ण वातावरणात पार पडली या कार्यक्रमास स्वप्निल पैलवान तासगाव सुभाष खटावकर पंढरपूर काते कांतेश्वर जवळे गोमेवाडी भारत जवळे आटपाडी महादेव स्वामी तारळे सुभाष जंगम शिवपुरी शिवानंद साखर पुणे चंद्रकांत साखरे पुणे तेजश्री स्वामी बार्शी मिरज जंगम वडूज दिलीप तवटे मसवड योगेश स्वामी माऊली बसवेश्वर स्वामी जोगेंद्र स्वामी विश्वेश्वर स्वामी मोरेश्वर स्वामी तसेच वीरशैव लिंगायत समाजातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी महामंगल आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली