कराड:-संस्कारशील,सौजन्यशील व आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे स्व. सौ. वेणूताई चव्हाण – डॉ. छायादेवी घोरपडे.
प्रतिनिधी प्रा.संतोष बोंगाळे कराड:-9923900840

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:- 8208717483
संस्कारशील,सौजन्यशील व आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे स्व. सौ. वेणूताई चव्हाण – डॉ. छायादेवी घोरपडे.
कराड : (दि.२, प्रतिनिधी) “कराड-अमृत हे समुद्रमंथनातून देवादिकांना प्राप्त झाले. आचार, विचार व संस्कार हे बालपणीच स्वीकारायचे असतात. सौ. वेणूताईंनी बालवयातच सुशीलता व शालीनता या गोष्टींना महत्त्व दिले. वेणूताईंचे बालपण हे सुखासमाधानात व आनंदात गेले. जबाबदारी पेलण्याची सुरवात माहेरपणापासूनच सुरू झाल्यामुळे संसाराचे ओझे अखेरपर्यंत त्यांनी पेलले. विवाहानंतर कठीण काळाला सुरुवात झाली .1942 च्या चळवळीप्रसंगी कसोटीच्या काळात पहिली संक्रांत ही भूमिगत राहूनच केली. यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपले जीवन मातृभूमीसाठी समर्पित केले होते. ज्याच्या अंगी श्रेष्ठत्व असते तेच कुटुंब प्रेममय असते.” असे विचार मा. डॉ. सौ. छायादेवी घोरपडे (माजी प्राचार्या, रयत शिक्षण संस्था, सातारा) यांनी व्यक्त केले. त्या वेणूताई चव्हाण कॉलेज व यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. सौ. वेणूताई चव्हाण जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या ‘संस्कारांचा अमृतकुंभ : सौ वेणूताई चव्हाण’ या विषयावर व्याख्यान देताना प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
मा. डॉ. सौ. छायादेवी घोरपडे पुढे म्हणाल्या की, “एकविसाव्या शतकातील कुटुंबव्यवस्थेची अवस्था पाहता वेणूताई ह्या खरोखरच वात्सल्यमुर्ती होत्या. संपूर्ण कुटुंबावर मायेची पाखर घालून येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांच्या सेवेत त्या दंग होत्या. दातृत्व व धार्मिक वृत्तीबरोबरच ज्ञानसंपन्न तसेच विचारसंपन्नही होत्या. आपल्या पतीच्या पदाला साजेसे असे आपले आचरण पाहिजे. यासाठी त्या शांत, संयमी, सौजन्यशीलपणे पतीव्रतेचे जीवन जगत होत्या. आजच्या महिलांनी वेणूताईंचे गुण घ्यावेत.”
या समारंभाचे अध्यक्ष मा. श्री. भास्करराव कुलकर्णी (सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर, कराड) यांनी वेणूताईंच्या आठवणींना उजाळा देताना वेणूताईंना चव्हाण साहेबांनी पाठवलेली पत्रं म्हणजेच एका आत्म्याचा दुसऱ्या आत्म्याशी साधलेला संवादच आहे. असे सांगून त्यांनी वेणूताईस अल्पायुष्य मिळाल्याने खंत व्यक्त केली.
या कार्यक्रमास मा. श्री. अल्ताफहुसेन मुल्लासाहेब (जनरल सेक्रेटरी, श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर कराड), संस्था सदस्य श्री. अरुण पाटील (काका), मा. प्रकाश पाटील (बापू) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मा. दिलीपभाऊ चव्हाण, मा. नंदकुमार बटाणे, मा. मानसिंगराव पाटील, मा. सतीश पाटील, मा. रामचंद्र साळुंखे, मा. संजय बदियानी, मा. संभाजीराव सुर्वे, मा. चंद्रकांत हिंगमीरे, प्राचार्य, डॉ. एस. बी. केंगार, माजी प्राचार्य मा. बी. एन. कालेकर, रामभाऊ कणसे, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विध्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर स्वागत प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. सौ. एस. आर. सरोदे यांनी करून दिला. उपप्राचार्य आर. ए. कांबळे यांनी आभार मानले व प्रा सौ. एस. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.