सातारा:-साताऱ्यात पोलिसांची वकिली आली डिपार्टमेंटच्या अंगलट.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
साताऱ्यात पोलिसांची वकिली आली डिपार्टमेंटच्या अंगलट.
सातारा दि: सातारा जिल्ह्यात एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल तर त्याला पोलीस ठाण्याची धाव घ्यावी लागते. काही वेळेला तपास यंत्रणेनंतर आरोपीची व फिर्यादीची न्यायालयात बाजू मांडावी लागते. अशावेळी वकील देणे निर्विवाद असते. परंतु, सातारा जिल्ह्यात अनेक पोलीस विशिष्ट वकिलांची शिफारस करत आहेत. त्यामुळे पोलिसांची वकिली आता डिपार्टमेंटच्या अंगलट आली आहे. याबाबत पहिला उठाव वाई, पाचगणी, महाबळेश्वर येथील वकिलांनी करून खऱ्या अर्थाने आपल्या व्यवसायालाच न्याय देण्याची भूमिका घेतली. त्याची आता चर्चा सुरू झालेली आहे.
सध्या सातारा जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी व तपास यंत्रणेतील हलगर्जीपणा आणि विशेष बाब म्हणजे तपास अधिकारी आणि काही वकील यांचे साटेलोटे उघड करण्याचे काम वकील मंडळींनीच केल्यामुळे अनेक पक्षकारांनी धन्यवाद दिले आहेत. सातारा जिल्ह्यात पोलीस ठाण्यामध्ये किरकोळ गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण कमी असले तरी अनेक गुन्हे उघडकीस येण्यापूर्वीच त्याची भ्रूणहत्या केली जाते. काही वेळेला आरोपींना टेबल जामीन मिळवून देण्यासाठी पोलीसच न्यायालय चालवतात की काय? असाच ही अनुभव राजकीय हितसंबंध व आर्थिक निकषावर जामीन मिळालेल्या काही गुन्हेगारांनी बोलून दाखवलेला आहे. शेवटी गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे.त्यासाठी प्रामाणिकपणे तपास करणे व न्यायालयापुढे पुरावे सादर करणे अशी कामगिरी प्रामाणिक तपास अधिकारी करत असतात. त्यामुळे समाजामध्ये गुन्हे रोखण्याचे काम होत आहे. हे त्रिवार सत्य आहे.
मात्र, जिथे मलिदा गॅंग निर्माण झालेली आहे. ती एक तीळ सात जणांत वाटून खाते. पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारीनंतर न्यायालयात बाजू मांडण्यासाठी राजकीय वरदहस्त लाभलेल्या वकिलांची शिफारस केली जाते. विशेष बाब म्हणजे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये गुन्हेगारांची बाजू मांडणारी व कायद्याचा अभ्यास करणारी मंडळी निरापराधी आरोपीला शिक्षा होऊ नये. म्हणून काम करतात. परंतु, काही वेळेला पुराव्या अभावी अनेकांना शिक्षा सुद्धा होते तर काहींना पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली जाते . पुरावा ग्राह्य मान्य हे न्यायालयाचे काम आहे.अशा काही नामांकित वकील मंडळींचीच सातत्याने एखाद्या पोलिस ठाण्यामध्ये उठा बस वाढली की शंका घेण्यास वाव असतो. वाई वकील संघटनेने याविरुद्ध आवाज उठवून खऱ्या अर्थाने लोकशाहीतील एका स्तंभाची बुज राखली आहे. त्यांचे सर्व बाजूने कौतुक होत आहे. वाई वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड .रवींद्र भोसले उपाध्यक्ष अँड .भारती कोरवार सचिव ॲड. अक्षय भांडवलकर व संघाच्या सदस्यांनी दमदार पाऊल उचललेले आहे. आता सातारा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकारी याबाबत काय भूमिका घेतात? याकडे मूठभर लोकांचेच लक्ष लागलेले आहे.
न्यायालयातील कामकाजासाठी काही ठराविक वकिलांची नावे दस्तूर खुद्द काही पोलीस अधिकारी व कर्मचारी सुचवत असतात. तुमच्या दाव्याबाबत आम्ही सांगतो. त्या वकिलाकडे जा… असा सल्ला देत असतात . कर भला तो हो भला हा न्याय दिला जातो. परंतु सामान्य माणसं आवाज उठवत नाहीत .आता वाई वकील संघटनेच्या वकिलांनीच आपली स्वतःची बाजू मांडल्यामुळे पक्षकारांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. कारण ज्यांची शिफारस केली जाते त्या वकिलांची फी ही भरमसाठ असते. त्यातून न्याय मिळण्याची शक्यता ही तपास अधिकाऱ्यांच्या पुराव्यावर अवलंबून असते. त्यामुळे तर अनेकजण न कुरकुर… न बोलता… शिफारस केलेल्याच वकिलाकडे धाव घेतात.
खरं म्हणजे पोलीस ठाणे आणि न्यायालय व प्रसारमाध्यम या तीन घटकांकडून लोकांना न्याय मिळण्याचे अपेक्षा असते. परंतु, आता काही प्रवृत्तींमुळे तिन्हीही गोष्टींकडे समाजमन नाराजी व्यक्त करत आहे. याबाबत आता सर्वांनीच जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित केले पाहिजे. अन्यथा जिल्ह्यात संपूर्ण मंत्रिमंडळ नेमले तरी या मलिदा गॅंग यांचे कुणी वाकडं करू शकणार नाही. असे भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचेच या घटनेने सिद्ध झाले आहे. सामान्य माणसाला न्याय देण्यापेक्षा सर्व पैशाचा खेळ चाललेला आहे की काय? असे ज्येष्ठ विधी तज्ञ यांनी मत व्यक्त केले आहे.
फोटो प्रतिनिधी स्वरूपात आहे
ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन