खटाव:-मायणी परिसरातील रब्बी हंगाम पीक काढणी अंतिम टप्प्यात.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605
मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
मायणी परिसरातील रब्बी हंगाम पीक काढणी अंतिम टप्प्यात.
मायणी प्रतिनिधी__& अन्नधान्याची पिके म्हणून ओळख असणाऱ्या रब्बी हंगामातील ज्वारी गहू हरभरा कांदा करडई इत्यादी अन्नधान्याची पिके काढणी मायणी परिसरात अंतिम टप्प्यात आली आहे अवकाळी पावसाने पिकाची हानी होऊ नये म्हणून बळीराजाची धांदल उडाली आहे ज्वारी हरभरा या पिकाची पेरणी सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्यात करतात परंतु यंदा या महिन्यात संतत धार पाऊस झाल्याने ज्वारीचा पेरा होऊ शकला नाही ज्यांनी पेराकेला त्यांना पुन्हा दुबार पेरा करावा लागला सध्या ज्वारीच्या क्षेत्रात गतवर्षीपेक्षा 50 टक्के घट झाल्याने ज्वारीच्या कडब्याचे भाव गगनाला भिडले आहेतज्वारी काढणे दर सात हजार रुपये एकर असून खुडणीचा दर एका महिलेचा अडीचशे रुपये आहे त्यानंतर मळणीचा दर अडीचशे रुपये पोतेअसल्याने शेतकऱ्याला ही ज्वारी चार हजार रुपये दराने पडते व स्वतः घेतलेले कष्ट ही वाया जातात उलट गहू पिकाला आठ ते नऊ पाणी दिल्यानंतर काढणीचा दर मशीन चा 3000 रुपये एकर असल्याने एका तासात गहू तयार होऊन मिळतो एकूणच काय बळीराजाची स्थिती आई जीव घालीन व बाप भीक मागू देईना अशी झाली आहे