खटाव:-ऊसतोड कामगार आपल्या गावाकडे परतू लागल्याने खटाव तालुक्यातील साखर कारखाने बंद होण्याच्या मार्गावर.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605
मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
ऊसतोड कामगार आपल्या गावाकडे परतू लागल्याने खटाव तालुक्यातील साखर कारखाने बंद होण्याच्या मार्गावर.
मायणी प्रतिनिधी_कायम दुष्काळाच्या छायेत राहणाऱ्या खटाव तालुक्यात खटाव मान ऍग्रो पडळ वर्धमान ॲग्रो घाटमाता औंध तसेच तसेच गोपुज येथील कारखान्यातील ऊस तोडी टोळी ऊस तोडी कामगार आपल्या गावाकडे परतू लागल्याने कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत सर्वसाधारणपणे ऊसतोड कामगार हे बीड उस्मानाबाद लातूर जिल्ह्यातील असून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात ते ऊस तोडण्यासाठी कारखान्याच्या करारावर आलेले असतात परंतु कारखान्याकडून घेतलेली उचल पूर्णपणे संपलेली असताना हे कामगार आपल्या गावाकडे जाण्यास उतावीळ झालेले असतात त्यामुळे जरी शासनाने कारखाने चालू ठेवण्याचे आदेश काढले असले तरी प्रत्यक्ष ऊस तोडी करणारे कामगार नसल्याने कारखाना बंद होण्याची वेळ आलेली आहे