फलटण:-मराठी साहित्यिकांचा संवाद वाढायला हवा : प्रा विक्रम आपटे
प्रतिनिधी आशितोष चव्हाण:-7378619519

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
मराठी साहित्यिकांचा संवाद वाढायला हवा : प्रा विक्रम आपटे.
फलटण:
मराठी साहित्यातील संवाद वाढला जावा ग्रामिण भागातील साहित्याचे अनुवाद करून हे साहित्य इतर भाषेत पोहचवावे त्यामुळे मराठी साहित्य व्यापक होईल असे मत जेष्ठ साहित्यिक प्रा विक्रम आपटे यांनी साहित्य संवाद या कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने फलटण तालुक्यातील जेष्ठ साहित्यिकांचा सन्मान व साहित्य संवाद चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन शासकीय विश्रामगृह फलटण येथे केले होते
यावेळी जेष्ठ साहित्यिक रविंद्र येवले यांनी आपण वाचलेली पुस्तके इतरांनी वाचावीत म्हणून मी प्रयत्न करत असतो व्याख्याने देताना साहित्यिक संदर्भ दिल्यावर वाचकांना ते पुस्तक वाचण्याची इच्छा निर्माण होते ही एक साहित्य सेवाच आहे असे मानायला हरकत नाही , सर्ज्याकार सुरेश शिंदे यांनी तरुणांच्या मधील प्रतिभा ओळखून ती जोपासली गेली पाहिजे नवं तरुणांना लिहीत केलं पाहिजे त्यासाठी हा साहित्य संवाद आपण सर्वांनी मिळून वाढवला पाहिजे असे मत व्यक्त केले ,
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाहक ताराचंद आवळे महादेव गुंजवटे , लेखिका सौ सुलेखा शिंदे सौ आशा दळवी रानकवी राहुल निकम युवा साहित्यिक विकास शिंदे यांना सन्मानित करण्यात आले या वेळी प्रसाविकात मनसे चे उपजिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी मराठी चा व मराठी माणसाचा सन्मान व्हावा या उद्देशानेच पक्षाची स्थापना मा राज ठाकरे यांनी केली होती त्याचा एक कृतिशील भाग म्हणून आम्ही आज जेष्ठ लेखकांचा सन्मान करीत आहोत आम्ही मराठी बद्दल व साहित्यिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो
या वेळी विकास शिंदे यांनी फलटण तालुक्यातील सर्व लेखकांची पुस्तके एकत्र करून साहित्यिक वारसा जपणार असल्याचे सांगितले यासाठी जेष्ठ साहित्यिकांनी मार्गदर्शन करावे असे आवाहन त्यांनी केले
आभार निलेश जगताप यांनी मानले यावेळी विशाल सूर्यवंशी ज्ञानेश्वर चौधरी रामदास खंडाळे व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते