पुणे:-‘त्या’ हकालपट्टीनंतर तब्बल 50 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे ‘मनसे’ला ‘रामराम’
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
‘त्या’ हकालपट्टीनंतर तब्बल 50 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे ‘मनसे’ला ‘रामराम’
पुणे, दि. 24 (शफिक शेख) :- कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेनं भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. याच दरम्यान, राज ठाकरेंचा आदेश डावलून महाविकास आघाडीचे उमेदवार कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा प्रचार करणाऱ्या मनसैनिकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत ही कडक कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, बाबू वागस्कर यांच्या आदेशाने पक्षविरोधी काम करणाऱ्या या सर्वांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे असं बाबर यांनी जाहीर केलेल्या पत्रात लिहिलं आहे. आता या कारवाईनंतर मनसेतील वाद चव्हाट्यावर आला आहे. या कारवाईविरोधात तब्बल ५० पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहे.
यात रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल बांदांगे, रिझवान मिरजकर, प्रकाश ढमढेरे, नीलेश कदम यांचा समावेश आहे. याबाबतची माहिती शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पत्रक काढून माहिती दिली आहे. मात्र, या कारवाईनंतर आथा मनसेत मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण या कारवाईविरोधात तब्बल ५० कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेत राजीनामे दिल्याची माहिती समोर येत आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र मनसैनिक प्रचार करणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार मनसैनिक प्रचारात सहभागी न होता वैयक्तित पातळीवर भाजपचं मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे असं मनसैनिकांना सांगण्यात आलं होतं.