कुसुंबी:-भ्रष्टाचारासाठीच सातारा जावळीत महायुतीचा थेट पण फेकचा नारा-रमेश चिकणे.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
भ्रष्टाचारासाठीच सातारा जावळीत महायुतीचा थेट पण फेकचा नारा-रमेश चिकणे.
कुसुंबी दि: महाविकास आघाडीचे युवा नेते अमित जी कदम यांना उमेदवारी मिळाल्यापासून हाती मशाल घेऊन यशस्वी मार्गक्रमण सुरू झाली आहे. सातारा जावळीतील अस्मिता स्पष्ट झाली आहे. निवडणुकीचे मुद्दे मांडण्याऐवजी खरं म्हणजे भ्रष्टाचारासाठीच महायुतीचे एक आहे आणि थेट पण फेक असल्याचा नारा देण्याची वेळ आल्याची टीका होऊ लागलेली आहे. भ्रष्टाचारी भक्तासाठीच असा दारा देत असल्याचे प्रतिपादन रमेश चिकणे यांनी कुसुंबी परिसरातील प्रचार दौऱ्यानिमित्त केले. महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार अमित जी कदम यांचे चिन्ह मशाल खऱ्या अर्थाने घरोघरी पोहोचवण्याचे काम इमाने इतबारे कार्यकर्ते करत आहेत. एका बाजूला सत्ताधाऱ्यांचा शाही प्रचार यंत्रणा आणि दुसऱ्या बाजूला धरणग्रस्त, कष्टकरी, शेतमजूर ,ग्रामस्थ आणि बेरोजगार तरुणांच्या भवितव्यासाठी त्यांनी हाती घेतलेली मशाल असे चित्र दिसत आहे. कोणत्याही भूलथापाला बळी न पडता ही निवडणूक स्वाभिमानासाठी व भवितव्याच्या विकासासाठी हाती घेतल्याचे मत अनेक जण व्यक्त करत आहे. काही लोकांना पंधरा दिवसांपूर्वी निवडणूक म्हणजे आपल्या हातचा मळ वाटत होता. आता परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहे. आता पायाला भिंगरी बांधून गल्लीबोळात विकास न केल्यामुळे फिरावे लागत आहे. ज्यांनी विकास केली ते आपला मतदार संघ सोडून महाराष्ट्रभर प्रचार दौऱ्यात हिंडत आहेत. परंतु, त्याला सातारा जावळी अपवाद आहे .आता सर्वच भागात विकास कामे केली. हे सांगतात हाच मोठा विनोद आहे. मनोज धनावडे म्हणाले, निवडणुकीमध्ये प्रचार करण्याची भूमिका सर्वांचीच आहे. परंतु, आता महायुतीला पराभूत दिसल्यामुळे दमदाटीचा प्रकार सुरू करण्यात आलेला आहे. हे निषेधार्थ असून कार्यकर्त्यांच्या पाठीशी महाविकास आघाडीचे सर्वच नेते उभे राहिलेले आहेत. ज्यांना स्वतःच्या कर्तबगारीवर विश्वास नाही. अशीच मंडळी दहशत व दमदाटी पसरवत आहेत. हे फार दिवस चालणार नाही. सध्या महायुतीचे काही बिदागी बहादुर प्रचारकांचे चेहरे पाहिले तर एका बाजूला त्यांचे चेहरे व दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराचा मुखवटा स्पष्टपणे दिसू लागलेला आहे. स्थानिक पातळीवर ज्यांनी फक्त ठेकेदारीतून पैसे कमावले. असे हाताच्या बोटावर मोजण्या इतके आपल्या ठेक्याचे नूतनीकरण करण्यासाठी धडपडत आहेत. त्यांच्या भुलथापेला मतदार यावेळी मशाल पेटवून वेगळा निकाल देणार आहेत. हे त्यांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागलेली आहे. मशाल एक क्रांतीचे व स्वाभिमानाचे प्रतीक बनलेले आहे. आज सातारा जावळी शिवसेनेचे विकास आघाडीचे उमेदवार श्री कदम यांची भेट घेऊन सुज्ञ मतदार बंधू-भगिनी त्यांची आपुलकीने विचारपूस करत आहेत . ही विजयाची नांदी ठरणार आहे. सध्या कुसुंबी, निझरे, ओझरे ,धुंद, गांजे, मोहट, मेढा , परळी, सावंतवाडी, अंबवडे,कुडाळ, बिभवी, सायगाव, आलेवाडी, मोरघर, महीगाव ,पवारवाडी, खर्शी, चिंचणी, बामणोली, विवर ,कावडी, आंबेघर करहर, दापवडी, वहागाव परिसरात मशालचाच बोलबाला आहे. हे आता ग्रामस्थ ही मान्य करू लागलेले आहेत.