सातारा:-पत्रकार शशी वारिशे यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यामध्ये सातारा जिल्हा हरीश पाटणे यांच्या माध्यमातून अग्रेसर.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार शशी वारिशे यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यामध्ये सातारा जिल्हा हरीश पाटणे यांच्या माध्यमातून अग्रेसर.
सातारा जिल्ह्यात मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष हरीश पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सर्वात मोठा पत्रकारांचा मोर्चा सातारा जिल्ह्यात झाला.
सदैव पत्रकारांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी हरीश दादा पाटणे, विनोद कुलकर्णी, शरद काटकर हे अग्रेसर असतात दोन दिवसांपूर्वी झालेल्या साताऱ्यातील मोर्चा देखील महाराष्ट्रातील सर्वात मोठा पत्रकारांचा मोर्चा असे बोलले जात आहे.
महाराष्ट्रील पत्रकारांचा दबाव आणि सततचा पाठपुरावा यामुळे शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबियांना २५ लाख रूपयांची मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज जाहीर केले ..
शशिकांत वारिशे यांचा मुलगा यशच्या पुढील शिक्षणाची आणि नोकरीची जबाबदारी देखील उदय सामंत यांनी घेतली आहे..
महाराष्ट्रातील पत्रकारांनी दाखविलेल्या एकजुटीमुळे हे शक्य झाले.. सर्वांचे आभार