श्रीरामपूर:-साखर कारखाऱ्यांच्या भ्रष्ट व्यवस्थापनास सरकारचे अभय : औताडे
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली मान्यता प्राप्त )
साखर कारखाऱ्यांच्या भ्रष्ट व्यवस्थापनास सरकारचे अभय : औताडे
श्रीरामपुर ( RPs स्टार न्युज ) शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजी नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सरसकट ३५०० रुपये प्रति टन ऊस दर देण्याची मागणी करत साखर आयुक्तांना निवेदन दिले आहे . शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी सांगितले की . सहकारी साखर कारखान्यांच्या भृष्ट व्यवस्थापनास सरकारचे अभय मिळाल्याने ऊस दर सातत्याने कमी होत आहे
२००९ – १० मध्ये केंद्र सरकारने एफआरपी कायदा लागू केला असता . ऊस दर – १४०० – १५०० रुपये प्रति टन होता त्यावेळी साखरेचे दर २२०० रुपये प्रति क्विंटल होते मात्र आज साखरेचे दर ३५०० – ३८00 रुपये प्रति क्विंटल असुनही ऊस दर २६०० – 3000 रुपये प्रति टन वर स्थिर आहे त्यामुळे गेल्या १४ वर्षात ऊस दरामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही . असे औताडे म्हणाले कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले मात्र त्या प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला . एफआरपी कायधामध्ये साखर उतारा आणि ऊसतोड – वाहतुक खर्चावर कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे ऊस उत्पादकांची फसवणूक होत आहे . केंद्र सरकारने रिकव्हरी बेस ८% वरून १० .२५ % पर्यंत वाढवला असून त्यामुळे ऊस उत्पादकांचे प्रति टन ७०० रुपयांचे नुकसान झाले आहे जिल्ह्यातील सहकार साखर कारखान्यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेंतर्गत ऊस उत्पादकांना योग्य दर देण्याचे आश्वासन दिले आहे मात्र अशोक साखर कारखान्याने मागील वर्षी आणि यावर्षीही कपात करण्याचा निर्णय घेतला आहे गणेश साखर कारखान्याने 3000 रुपये प्रति टन ऊस दर दिला असून अशोक व मुळा भेंडा साखर कारखान्यांनी यापेक्षा कमी दर देऊन ऊस उत्पादकांनी फसवणुक केली आहे . शेतकरी संघटनेने साखर आयुक्तांना कारखान्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे . जर १५ डिसेंबर 20 24 पर्यंत कारवाई झाली नाही तर संघटना बेमुदत ठिय्या आंदोलन करेल असेही निवेदनात नमूद केले आहे.