कराड:-कराडला हजोरोंच्या उपस्थित विजय दिवस समारोह सोहळा उत्साहात संपन्न….
प्रतिनिधी अन्सार मुल्ला कराड:-7020583088

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
कराडला हजोरोंच्या उपस्थित विजय दिवस समारोह सोहळा उत्साहात संपन्न….
December 16, 2022
कराडला हजोरोंच्या उपस्थित विजय दिवस समारोह सोहळा उत्साहात संपन्न….
कराड दि.16-(प्रतिनिधी) 1971 च्या बांगला मुक्ती संग्रामातील दैदिप्यमान विजया प्रित्यर्थ कराड येथे गेली 25 वर्ष विजय दिवस समारोह सजरा केला जातो. यावर्षी विजय दिवस समारोहर समितीचे रौप्य महोत्सवी वर्ष उत्साहाने व दिमाखदार व हजारोंच्या उपस्थित साजरा करण्यात आला. या समारोहासाठी देशाचे माजी संरक्षण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थिती लावून गेली 25 वर्ष मोठ्या उत्साहात व दिमाखदार पणाने विजय दिवस साजरा करणाऱ्या निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी लेफ्टनंट जनरल जे एस पन्नू, खा. श्रीनिवास पाटील,आ. बाळासाहेब पाटील तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
कराडला 1998 साली पहिल्यांदा विजय दिवस कराडच्या शिवाजी स्टेडियमवर साजरा करण्यात आला. त्यानंतर निवृत्त करणार संभाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजय दिवस समारोह समितीची स्थापना करण्यात आली. नि.कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नि.कर्नल एम डी कुलकर्णी व आजी माजी सैनिकांच्या पुढाकाराने अव्यातपणे अविरतपणे हा विजय दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. दरवर्षी नि. कर्नल संभाजीराव पाटील यांच्या पुढाकाराने संरक्षण मंत्रालयाकडून कराडच्या विजय दिवसासाठी सैन्य दलातील विविध विभागातील जवान, शस्त्रास्त्रे कराडकरांना पहावयास मिळाली. नि. कर्नल पाटील यांना चंदू जाधव, अरुण जाधव, विनायक विभुते, संभाजीराव मोहिते, विलासराव जाधव, विजय कूंभार यांच्यासारखे खंदे समर्थक लाभल्याने गेली 25 वर्ष हा विजय दिवस मोठ्या दिमाखदारपणे साजरा होत आला. भारतात विशेष करून महाराष्ट्रात ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात कराडलाच हा विजय दिवस साजरा केला जात आहे.
या विजय दिवस समारोहाच्या निमित्ताने कराडकरांना गेल्या पंचवीस वर्षात पहिल्यांदाच भारतीय सैन्यदलातील विविध विभागांची शस्त्र-अस्त्रे, जवानांच्या कसरती पाहण्यास मिळत होत्या. न भूतो न भविष्यतो अशा स्वरूपाची गर्दी कराडच्या शिवाजी स्टेडियमवर पाहावयास मिळाली. भारतीय सैन्य दलातील सर्वात मोठे व वेगवान सुकायु व जग्वार विमानांचा थरार ही कराडकर यांनी यापूर्वी पाहिला. वायुसेनेची हेलिकॅप्टर, व युद्धात वापरले जाणारे रणगाडे, बोपर्स तोफा यांच्यासह विविध प्रकारची शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी कराडकरांना केवळ आणि केवळ कर्नल संभाजीराव पाटील यांच्यामुळे मिळाली. आज या विजय दिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दस्तूरखुद्द शरद पवार यांनी संभाजीराव पाटील यांच्या कामाचे कौतुक करून त्यांची पाठ थोपटली.
गेली 25 वर्षे कराड सारख्या ग्रामीण भागाच्या ठिकाणी साजरा होणाऱ्या विजय दिवस समारंभामुळे सातारा जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना सैन्य दलात भरती होण्याचे बळ मिळालं. अनेक तरुणांनी सैन्य दलात भरतीसाठी कसोशीने प्रयत्न केले. गेल्या 25 वर्षात शेकडो तरुण सैन्य दलात भरती झाले. याचे श्रेय निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांना जाते. आजही सैनिकांचा शूरविरांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याचे नाव घेतलं जातं. आणि या जिल्ह्यातील अनेक शूरवीरांनी या देशासाठी आपले प्राण ही गमावले आहेत हे ही तितकीच अभिमानाची गोष्ट आहे.
आज झालेल्या विजय दिवस समारोहात देशभक्तीपर गीताने पाहुण्यांचे आगमन त्याचबरोबर विजय ज्योतीचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या विजय ज्योतीचे स्वागत मा. शरद पवार यांनी केले. त्यानंतर महिलांची बाईक रॅलीचे आगमन स्टेडियमवर झाल्यानंतर एनसीसी,स्थानिक महाविद्यालय, शाळा यांच्या विद्यार्थ्यांचे संचलन आणि मानवंदना देण्यात आली. याचवेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
विजय दिवसानिमित्त आयोजित केलेल्या मुख्य समारंभास प्रारंभ झाल्यानंतर एरो मॉडेलिंग व पॅराग्लाइडिंगने या महोत्सवात सुरुवात झाली. त्यानंतर अरुणाचल प्रदेश मधून आलेल्या कलाकारांनी देशभक्तीपर गीत व अरुणाचल फोक डान्स करून उपस्थितांची मने जिंकली. मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी मल्लखांब वरील कसरती करून वाहवा मिळवली. त्यानंतर जगदंबा ढोल ताशा पथक व दानपट्टा प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. होली फॅमिलीचा बँड डिस्प्ले तसेच बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या गतका मार्शल आर्टची प्रात्यक्षिके पाहताना अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत टाळ्यांचा कडकडाट करत प्रतिसाद दिला.