खटाव:-वनविभाग मनमानी कारभाराविरुद्ध प्रजासत्ताक दिनी उपोषण.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
वनविभाग मनमानी कारभाराविरुद्ध प्रजासत्ताक दिनी उपोषण.
विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते विशाल चव्हाण यांचे उपोषण वादळी चर्चेने आंतरराष्ट्रीय मानव अधिकार सामाजिक न्याय आयोग यांच्या सांगण्यावरून अखेर उपोषण सोडले.
मायणी – प्रतिनिधी
खटाव तालुका वनविभाग अधिकारी यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशीच्या मागणीसाठी २६ जानेवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते व निसर्गप्रेमी विशाल आप्पासो चव्हाण मायणी , ता . खटाव , जि . सातारा यांनी आक्रमक भूमिका घेत मायणी येथे वनविभाग कार्यलयाबाहेर उपोषणाचा इशारा दिला ते उपोषण आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार सामाजिक न्याय आयोगाच्या मदतीने सोडले
खटाव तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे उपोषणाचे निवेदन देण्यात आले होते त्यात असे म्हंटले आहे की, खटाव तालुक्यातील संपूर्ण वनविभाग क्षेत्रात आलेल्या कामांच्या प्रती प्रत्यक्ष आलेला निधी व खर्च झालेला निधी यात कमालीची तफावत आढळून येत असल्याने या संपूर्ण प्रकरणी वनक्षेत्रपाल शीतल फुंदे यांची विभागीय चौकशी करून आलेल्या निधीचा व खर्चाचा तपशील तपासाच्या मागणीसाठी वनविभागाच्या भ्रष्ट कारभाराविरुध्द देशाच्या प्रजासत्ताक दिनी गुरुवार दि . २६ जानेवारी २०२३ रोजी खटाव तालुक्यातील मायणी पंढरपूर रोड वरील ऐतिहासिक व निसर्ग संपदा असणाऱ्या व स्थानिक वनविभाग यांच्याकडून दुर्लक्षित झालेल्या मायणी ब्रिटिशकालीन तलाव व मायणी पक्षी आश्रयस्थान याठिकाणी बेमुदत उपोषणास बसले होते सदर निवेदन विभागीय कार्यालय कोल्हापूर,जिल्हाधिकारी सातारा ,उपवनसंरक्षक,पोलीस अधीक्षक,प्रांत खटाव यांनाही देण्यात आले होते 15दिवसात सविस्तर माहिती देण्यात येईल असे लेखी आश्वासन शितल फुंदे मॅडम यांनी दिली त्यामुळे आंतरराष्ट्रीय मानव अधिकार सामाजिक न्याय आयोगाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमरदीप आपगे पश्चिम महाराष्ट्र मुख्य संघटन महासचिव डॉ संतोष डांगे पश्चिम महाराष्ट्र सचिव बाबासाहेब कुंभार सातारा जिल्हा अध्यक्ष प्रशांत देशमुख सातारा जिल्हा उपाध्यक्ष राजाराम कचरे सातारा जिल्हा सचिव राजाराम जाधव सातारा जिल्हा खजिनदार वीरधवल ढवळीकर सतीश डोंगरे ऍक्टिव्ह मेंबर पश्चिम महाराष्ट्र मुख्य उपाध्यक्ष जर्नालिजम दिलीप पुस्तके सर व सर्व सामाजिक संस्था, मायणी परिसरातील पत्रकार नागरिक
उपस्थित होते यांच्या उपस्थितीत अखेर उपोषण सोडले