म्हसवड:-माण- खटाव मध्ये नव्या चेहऱ्यालाच संधी तरच परिवर्तन…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
माण- खटाव मध्ये नव्या चेहऱ्यालाच संधी तरच परिवर्तन…
म्हसवड दि: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे रणनीती व प्रचार यंत्रणा सुरू झालेली आहे. परिवर्तनाचे वारे दिसत असले तरी या वाऱ्याच्या थराला निवडणूकीत मतदान करताना बहुजन मतदार युवा नेते शेखर गोरे व आ. गोरे यांच्या पाठीशी राहतात. वर वर पाहता पवनचक्कीच्या पात्याप्रमाणे नुसत्याच हवेच्या दाब आहे. पण, त्याचा सर्वसामान्यांना काही वाटत नाही. कारण, भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांना पराभूत करायचं असेल तर लोहा लोहे को काटता है …या उक्ती प्रमाणे बहुजन उमेदवारच परिवर्तन करू शकतो. अशी आता दबक्या आवाजात चर्चा सुरू झालेली आहे.
माण- खटाव विधानसभा मतदारसंघातील मतदानाची गेले तीन वेळची आकडेवारी पाहता शिवसेनेचे युवा नेते शेखर गोरे हे पराभूत झाले असले तरी त्यांच्या मताच्या आकडेवारीनुसार अनेकांची स्वप्न धुळीस मिळत आहेत. तरीसुद्धा काहीजण सवता सुभा करून भाजप आ. जयकुमार गोरे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लोकशाहीमध्ये सर्वांनाच निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. तसा सर्वसामान्य कुटुंबातील गेली पाच वर्ष नव्हे तर दहा वर्ष सामान्य जनतेसाठी संघर्ष करणारे युवा नेते म्हणून म्हसवड नगरीचे अजिनाथ केवटे यांनी सुद्धा आता निवडणुकीत सक्रिय होण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे.
सध्या माण खटाव मध्ये महायुती मधील भाजपचा पराभव करण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. असा समाज माध्यमाद्वारे महाविकास आघाडी काही नेते व कार्यकर्त्यांनी प्रचार सुरू केलेले आहे.
माण- खटाव विधानसभा मतदारसंघात २०१९ रोजी निवडणुकीत भाजपचे आ .जयकुमार गाेरे हे २९५५ मतांनी विजयी झाले होते. त्यांना ९१ हजार २३० मते मिळाली . आमचे ठरलंय आघाडीचे अपक्ष उमेदवार व सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख यांना ८८ हजार २७५ मते मिळाली होती . शिवसेनेचे युवा नेते व संपर्कप्रमुख शेखर गाेरेंना ३७ हजार ५१८ मते मिळाली होती .
आज संपूर्ण महाराष्ट्रात तथा सातारा जिल्ह्यात राजकीय परिस्थिती बदललेली आहे .राजकारणाच्या मार्गातूनच विकासाची कामे करू. असे आश्वासन देत आहेत. मात्र गेल्या दहा वर्षात त्यांचा व्यक्तिगत विकास झाला पण माण खटावच्या सामान्य माणसाच्या पदरी काय पडले? याचा आता शोध घ्यावा लागत आहे.
तसं पाहिलं तर माण- खटाव च्या मातीमध्ये स्वबळावर व स्वखर्चावर सामाजिक कार्य करणारे व्यक्ती म्हणून शिवसेनेचे शेखर गोरे व सामाजिक कार्यकर्ते म्हणून आजिनाथ केवटे अशी दोनच नावे सध्या तरी चर्चेत आहेत. इतर अनेक जण सामाजिक कार्य करत आहेत. त्याबद्दल दुमत नाही. परंतु, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवून आपला हक्क व न्यायासाठी झगडणारे अनेक नेत्यांपैकी हे दोन नेते लक्षवेधी ठरत आहेत.
गेले तीन वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ शकल्या नसल्याने सर्वच राजकीय पक्षातील सामान्य कार्यकर्ता अस्वस्थ झालेला आहेत ..एकूणच महाराष्ट्रात प्रशासकीय कारभार असल्यामुळे ज्यांच्या हाती स्थानिक सत्ता त्याचे प्रशासन ऐकते. असा आता नवीन प्रयोग सुरू झालेला आहे. या प्रशासनाला जाब विचारण्याची धमक शिवसेनेचे शेखर गोरे यांच्यासह अनेक आंदोलकांनी दाखवून दिले आहे. त्यामध्ये सर्वात वेगळ्या आणि आक्रमक आंदोलन करणारे युवा नेते आजिनाथ केवटे हे जरी आर्थिक फाटके असले तरी विचाराने नेटके आहेत . त्यांनी कधीही आमदार गोरे यांच्याशी तडजोड केलेली नाही. त्यांच्या पाठीशी नक्कीच बहुजन समाज परिवर्तन करण्यासाठी उभा राहील. त्यांच्या पाठीशी गर्दी जरी नसली तरी परिवर्तनाचा ध्यास घेणारी दर्दी लोक आहेत.
आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी कडून शिवसेना आक्रमकरीत्या लढू शकते आणि त्यासाठी युवा नेते शेखर गोरे हे पर्याय आहे. हे सुद्धा मान्य करावे लागत आहे. विरोधाला विरोध नसून जर भाजपला जर बाजूला करायचे असेल तर मतदारांनी आता सर्वसामान्य चेहरा म्हणून शिवसेनेचे शेखर गोरे यांना महाविकास आघाडीचे किंवा सामान्य चेहरा म्हणून आजिनाथ केवटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर करून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब व किसनवीर आबा यांच्या सत्यविचाराप्रमाणेच सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून आजिनाथ केवटे यांना उमेदवारी द्यावी.
या मतदारसंघात ८० टक्के मतदार हे सर्वसामान्य असून या सर्वसामान्य मतदारांचे प्रतिनिधी सुद्धा सर्वसामान्य असावेत .या दृष्टीने आता युवा नेते आजिनाथ कवटे यांची मागणी होऊ लागलेली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील मोहिते- पाटील यांना विजयी करणारे शिलेदार म्हणून माण खटाव मधील कार्यकर्त्यांकडे पाहिले जाते.
लोहा लोहे को काटता है ….त्याप्रमाणे भाजपचे आ. जयकुमार गोरे यांचा पराभव करायचा असेल तर शिवसेनेचे शेखर गोरे किंवा आजिनाथ केवटे यांनाच संधी द्यावी. यासाठी सर्व जाती धर्मातील सर्वसामान्य कार्यकर्ते मागणी करू लागलेले आहेत . माण खटावच्या विकास कामाचा जर आढावा घेतला तर पाणी आणि पाणी आणि पाणी यातून कोणच बाहेर पडू शकले नाहीत.
वाळवंटामध्ये पाणी नसताना ऊस पिकवला जातोय. पर्यटन स्थळ उभे राहते. पण, माण खटाव मध्ये एकही पर्यटन केंद्र नसावे. यासारखे दुर्दैव नाही. लोकांना रोजगार दिला तर लोक अधिक प्रगती करतील. योग्यरित्या मार्गदर्शन, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा केंद्र, आयटी पार्क व नागरी सुविधा उभारणी सुद्धा महत्वाची आहे. यासाठी माण खटाव मातीतच राहणारे सामान्य कुटुंबातीलच व्यक्ती पाहिजे. यासाठी आता अजिनाथ केवटे यांची सुद्धा मागणी होऊ लागल्याने त्यांचा विचार व्हावा. असा आता सामान्य कार्यकर्त्यांना वाटत आहे . यासाठी आता सर्व जाती धर्मातील लोक त्यांच्या पाठीशी उभे राहत असल्याची माहिती दस्तुरखुद अजिनाथ केवटे यांनी दिलेले आहे.
प्रस्थापित वर्गाने ही यापूर्वी निवडणुका जवळून पाहिले आहेत. त्यांच्या मर्यादा ही स्पष्ट झाल्यामुळे आता त्यांना राजकीय पक्षावर अवलंबून राहावी लागत आहे. हे सुद्धा सत्य स्वीकारावे लागणार आहे. त्यामुळे सामान्यांन संधी देऊन परिवर्तन घडवून आणणे. हे आता मतदारांनी सुद्धा ठरवल्याचे दिसून येत आहे. फक्त राजकीय दृष्ट्या योग्य उमेदवाराची प्रतीक्षा आहे.
.—————————————
चौकट ———
युवा नेते अजिनाथ केवटे यांनी सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेकदा आंदोलन केलेले आहे. त्यामुळे त्यांचा माण खटाव विधानसभा मतदारसंघात आमदारकी लढवण्याचा नैतिक रत्या लोकशाहीने अधिकार दिला आहे. त्यांना महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून अधिकृत उमेदवारी मिळावी. अशी मागणी प्रा. राजेंद्र माने सर ,राजकुमार डोंबे, महेश सराटे, काशिनाथ रुपनवर, रियाज काझी सतीश केवटे, राजेंद्र लांब यांच्यासह अनेक मान्यवरांनी केलेली आहे.
——————————–