ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पुणे पिंपरी:-इथं खाली आग लागली असताना आपण कसला वैश्विक विचार करतोय – राज ठाकरे.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

इथं खाली आग लागली असताना आपण
कसला वैश्विक विचार करतोय – राज ठाकरे.
पिंपरी, दि. 8 (शफिक शेख):- महाराष्ट्रातील बेरोजगार तरूणांविषयीच्या समस्या मांडतांना राज ठाकरे यांनी सांगितले की, आज आपल्याला विश्व मराठी संमेलन घेण्याऐवजी महाराष्ट्र मराठी संमेलन घेण्याची गरज आहे. आपण कसला वैश्विक विचार करतो इथं खाली आग लागली आहे. महाराष्ट्रीयन तरूण तरूणींच्या रोजगाराविषयी विचार आधी करायला हवा, असे आवाहन राज ठाकरे यांनी आज केले.
जागतिक मराठी अकादमी आणि डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठ, पिंपरी आयोजित १८ व्या जागतिक मराठी संमेलनामध्ये ‘व्यंग, वास्तव आणि राजकारण’ या विषयावर आयोजित परिसंवादामध्ये ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर व प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. राजकारणाला दोष न देता विचार करणाऱ्या पिढीने आता राजकारणात पुढे येण्याची गरज असून जीवनावश्यक सर्व गरजांच्या पूर्ततेची प्रक्रिया राजकारणाभोवतीच फिरत आहे. या सुधारणेसाठी तुम्ही पुढे या, मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे अशी हाक व आवाहन प्रसिद्ध व्यंगचित्रकार व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे दिली.
चित्रकला, व्यंगचित्रकला, या प्रश्नांवरून सुरु झालेल्या प्रश्नांचा प्रवास राजकीय विषय तसेच मधल्या काळातील राजकारणात घडलेल्या घटना, घडामोडींना स्पर्श करीत अनेक विषयांवरची आपली मते बेधडकपणे राज ठाकरे यांनी व्यक्त करत आपल्यामधील कलाकार व राजकारणी यामधील विविध रूपांचे दर्शन घडविले.
वृत्तपत्रात व्यंगचित्राची जागा पहिल्या पानाऐवजी आतमध्ये येऊ लागल्याची खंत त्यांनी व्यक्त करत मुद्रित माध्यमात छापून येणाऱ्या चित्राशिवाय समाधान लाभत नसल्याचे म्हटले. सध्याच्या सोशल मीडियावर देखील त्यांनी आपल्या शब्दांचे फटकारे ओढले. सोशल मिडियामध्ये कोणीही येऊन काहीही व्यक्त होण्याच्या या पद्धतीवर खरं पाहता व्यक्त होण्यासाठी पैसे आकारायला हवे. तीच परिस्थिती चोवीस तास चालणाऱ्या न्यूज चॅनेलची आहे. जोपर्यंत महाराष्ट्रातील असंख्य सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक बाबींचे दर्शन घडत नाही तोपर्यंत काहीही ठीक नाही. राजकारण्यांची व्यर्थ बडबड या चॅनेलवाल्यांनी दाखवून सामाजिक प्रतिमा बिघडवली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
राज्यातील एकदोन उद्योग गेले म्हणून बोंब मारण्याऐवजी महाराष्ट्र सरकारने आता चांगल्या योजनांमध्ये लक्ष घालावे. पंतप्रधान हे देशाचे असतात त्यांचे सर्वच राज्यांकडे समान लक्ष हवे, जी काही योजना व प्रकल्प करायचे असेल ते आपल्याच राज्यात हवे ही भूमिका पंतप्रधानांना शोभत नाही. पंतप्रधानांनी काही चांगल्या गोष्टी ज्यामध्ये ३७० कलम, रामजन्मभूमी, आदी प्रश्न मार्गी लावले त्याबद्दल त्यांचे कौतुकच आहे, अशी टिप्पणी ठाकरे यांनी यावेळी केली.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती व स्वागताध्यक्ष डॉ.पी.डी.पाटील, संमेलनाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे विश्वस्थ व खजिनदार यशराज पाटील यांनी राज ठाकरे यांचा स्मृतिचिन्ह, शाल देऊन सत्कार केला.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button