वाई:-कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख यांची वाई अभ्यासकेंद्रास सदिच्छा भेट.
प्रतिनिधी वैष्णवी शिंदे:-9146802009

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख यांची वाई अभ्यासकेंद्रास सदिच्छा भेट.
ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीद घेऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने वंचितांच्या शिक्षणाचा ध्यास घेऊन १९८९ साली महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या रोपट्याचा आज संपूर्ण भारतभर विस्तार होऊन साडे चार हजार पेक्षा जास्त अभ्यास केंद्रांमधून साडेपाच लाख विद्यार्थी संख्येचा वटवृक्ष निर्माण झाला आहे. या प्रक्रियेत गेली सोळा वर्षे जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालय वाईच्या अभ्यासकेंद्राचे मोलाचे योगदान राहिले आहे हे अभ्यासकेंद्र अधिक सक्षम व संपन्न करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
अनेक नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम राबवून विद्यार्थ्यांचा बहुआयामी व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नेहमीच अग्रेसर असते. ११४ पेक्षा जास्त प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर आणि पी एच डी पर्यंतच्या अभ्यासक्रमांचे शिक्षण विद्यापीठाच्या विविध अभ्यासकेंद्रांच्या माध्यमातून दिले जाते. याचे पुढचे पाऊल म्हणून शेती व शेतीपूरक उद्योगांसाठी नवनवीन अभ्यासक्रम विद्यापीठाकडून राबवले जात आहेत. या माध्यमातून रेशीम उद्योगाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून नवा अभ्यासक्रम विद्यापीठाकडून राबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अभ्यासक्रमातून रेशीम उद्योग प्रक्रियेची सर्वांगीण माहिती विद्यार्थ्यांना करून देणे व अधिकाधिक तरुणांनी रेशीम उद्योग व शेती उद्योगाकडे वळावे, आधुनिक शेतीची कास धरावी, शेती व्यवसाय हा जास्तीत जास्त फायदेशीर ठरावा यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक चे कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख यांनी केले. वाई येथील किसन वीर महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रास त्यांनी सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या सोबत सौ. देशमुख तसेच पुणे विभागाचे विभागीय संचालक डॉ. ए. डी. जाधव व त्यांचे सहकारी श्री. संतोष वामन उपस्थित होत. या प्रसंगी किसन वीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले, केंद्रसंयोजक प्रा. रमेश डुबल यांनी उपस्थितांना पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी सातारा, सोलापूर जिल्ह्यातील रेशीम उद्योग केंद्रांचे प्रमुख अधिकारी तसेच वाई अभ्यासकेंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.