सातारा:-तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव ऑक्टोबर महिन्यात सातारच्या दौऱ्यावर ? शंकरराव गोडसे.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव ऑक्टोबर महिन्यात सातारच्या दौऱ्यावर ? शंकरराव गोडसे.
सातारा दि: भारत राष्ट्र समाज पक्षाचे सुप्रिमो के. चंद्रशेखर राव हे या वर्षातील ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सातारा दौऱ्यावर येण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या कार्यालयातून हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर नियोजनाची आखणी केली जाईल .अशी माहिती सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व शेतकरी संघटना व किसान मंच कार्याध्यक्ष शंकरराव गोडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिले आहे.
त्यांच्या खटाव व माण तालुक्यामध्ये मोसमी पाऊस पुरेसा असा पडलेला नाही. पिण्याच्या पाणी व शेती तसेच जनावरांसाठी लागणारा चारा व पाण्याची आता तीव्र टंचाई भासू लागलेली आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन सुद्धा राज्य सरकार किंवा जिल्हा प्रशासन अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, खऱ्या अर्थाने ज्याचे जळतं त्यालाच कळते. या म्हणीप्रमाणे सध्या माण खटाव तालुक्यातील जनता दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे होरपळून जात आहे.
कातर खटाव, फलटण, दहिवडी अशा ठिकाणी आंदोलन केले जात आहे. पाणी टंचाई बाबत व पिण्याच्या पाण्याबाबत उरमोडी व जिहे -कठा पूर योजनेचे पाणी सुरू करण्याची यावे. अशी मागणी केली असली तरी शासकीय आकडेवारीनुसार अंदाज घेऊन सध्या लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणा काम करत आहे. वास्तविक पाहता नैसर्गिक रित्या माण खटावला पाऊस पडणे अपेक्षित आहे. परंतु, वेळेनुसार पाऊस होत नसल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झालेले आहेत. ही बाब सातारचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना निवेदनाद्वारे सांगण्यासाठी श्री गोडसे सातारला आले होते. यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते व शेतकरी होते.
माण व खटाव तालुक्याला पाणी मिळावे. याला आम्ही प्राधान्य देत आहोत. अन्यथा प्रशासनाविरुद्ध तीव्र लढा लढण्याची धमक आहे. आता मला मोठ्या नेत्याची साथ लाभण्याची त्यांनी सांगितले. तेलंगणा राज्याच्या दौऱ्यानंतर ते पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारत असताना त्यांनी सांगितले की, छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यात येण्याचा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मनस्वी इच्छा आहे .जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ख्याती असलेल्या कास पठारला ज्यावेळी पुष्प पठार बहरते त्यावेळेला मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे साताऱ्यात आगमन व्हावे. या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. सातारा दौऱ्यामध्ये कास पठार ,स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळ, धावडशी येथील राणी लक्ष्मीबाई,,
कन्हेरखेड येथील महादेवजी शिंदे, घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेले प्रतापसिंह हायस्कूल, जलमंदिर अशा महत्त्वाच्या ठिकाणी त्यांनी भेट द्यावी. असा आग्रह कार्यकर्त्यांचा होत आहे. के .चंद्रशेखर राव हे एन टी रामराव यांचे चाहते असून तेलगू देशम पक्षातून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केलेली आहे. तेलंगणा राष्ट्र समिती मार्फत अनेक वर्ष त्यांनी संघर्ष केलेले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी फेडरल फ्रंट स्थापन केला होता. परंतु, त्यांना फारसं यश आले नाही. आता सध्या भाजप सरकारच्या विरोधात विरोधी पक्षाच्या आघाडीतील घटक पक्ष म्हणून ते सक्रिय झालेले असून त्यांनी सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, एच डी देवेगौडा, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. तसेच ते शरद पवार साहेब यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दौऱ्याने भारत राष्ट्र समाज बी आर एस पक्ष अंबेसिडर गाडीच्या वेगाने वाढेल. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
————————-
फोटो –