खटाव:-गायरान जमीनीवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णयाला स्थगिती देण्यात यावी.
प्रतिनिधी अनमोल गुरव खटाव:-9881355582

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
गायरान जमीनीवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णयाला स्थगिती देण्यात यावी.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान खटाव तालुकाच्या वतीने देण्यात आले निवेदन.
पुसेसावळी
कोर्टाने गायरान जमीनीवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर सरकारने तातडीने स्थगिती आनावी या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांना देण्यात आले आहे.चोराडे ता.खटाव या गावात गायरान जमीन 1960 पासुन ते 2022, पर्यंत साडेतीनशेच्या वर घरे वसली आहेत,त्या ठिकाणी सर्व जातीधर्माचे लोक वास्तव्यास आहेत, ग्रामपंचायत व विज वितरणचे कर नियमित भरत आहेत.त्यामुळे 16 फेब्रुवारी 2018 च्या नियमाची अंमलबजावणी कायम करावीत,या जागेचे शुल्क आकारुन अतिक्रमणे नियमित करावीत, आणि गोरगरीब लोकांचे सौसांर उध्वस्त होणार नाहीत याची काळजी घ्यावी.निवेदन दिल्या नंतर विक्रम पावसकर म्हणाले हे सरकार सर्व सामान्य लोकांचे विचार करणारे आहे,मी स्वता हा विषय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मांडला आहे.लवकरच सरकार पुनर्विचार याचिका दाखल करेल, आणि तरी पण गोरगरीबांचा सौसांर उध्वस्त होऊन देणार नाही, मी स्वतः त्याठिकाणी हजर असेन असे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांनी दिले.