आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोहगाव:-नैसर्गिक सामाजिक व मानसिक संवर्धनाचे कार्य महान ! नेत्रतज्ज्ञ डॉ. सुधा कांकरिया.

प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

कोडीराम नेहे लोहगाव ( वार्ताहर )निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाचे संमेलनातून नैसर्गिक ,सामाजिक व मानसिक संवर्धनाचे कार्य नक्कीच महान असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ सुधा कांकरिया यांनी केले. शिर्डी येथे निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ व शिर्डी संस्थान यांच्या वतीने तीन दिवसीय राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचा सांगता समारोप शिर्डी  येथील साई शताब्दी मंडप या ठिकाणी राज्याचे मा शिक्षण संचालक प्राथमिक दिनकरराव टेमकर साहेब यांचे अध्यक्षतेखाली व प्रसिद्ध समाजसेविका डॉ सुधा कांकरिया ,डॉ प्रकाश कांकरिया संस्थापक अध्यक्ष साईबन अहमदनगर ,निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद  दादा मोरे ,सचिव श्रीमती वनश्री मोरे , सखी मंचच्या अध्यक्षा प्रिया तांबोटकर , व्याख्याते प्राध्यापक भोसले सर राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त अनिल लोखंडे सर ,राज्य संघटक दिलीप धावणे , जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार विजय बोडखे , जिल्हा अध्यक्ष तुकाराम अडसूळ ,पुणे जिल्हा अध्यक्ष मारुती कदम , सुभाष वाखारे सर , उपाध्यक्ष प्रकाश केदारी सर , कार्याध्यक्ष प्रमोद काकडे  , संतोष परदेशी ,माधुरी काकडे मॅडम यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकरराव टेमकर यांनी सांगितले की चांगल्या वाटणाऱ्या अगदी छोट्या छोट्या उपक्रमांनी स्वतः पासून काही गोष्टींची सुरुवात करावी, म्हणजे मानसिक व बौद्धिक प्रदूषण निवारण होऊ शकेल. शासनाने दरवर्षी पाठ्यपुस्तके वितरीत करण्यापेक्षा विद्यार्थ्यांना मोफत देत असलेल्या पुस्तकांचे महत्व पटावे त्यासाठी त्यांना पुस्तकांची जपणूक कशी करावी याचे  शिक्षण द्यावे म्हणजे कागदांसाठी लागणारे वृक्षांची बचत होऊन वृक्षसंवर्धन वाढ होईल. असे मनोगत त्यांनी व्यक्त केले                                                                                    यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ प्रकाश कांकरिया यांनी अशा प्रकारचे पर्यावरण संमेलनाला राज्यातील विविध जिल्ह्यातून उत्स्फूर्तपणे लाभलेला प्रतिसाद कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन केले , तर वंडर रेकॉर्ड ऑफ गिनीज अवॉर्डसाठी ज्यांच्या बेटी बचाव उपक्रमाची नोंद झाली अशा महान व्यक्तिमत्त्व असलेल्या समाजसेविका प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ सुधा कांकरिया यांनी आपल्या प्रमुख मनोगतातून उपस्थित पर्यावरण प्रेमींना पर्यावरण संवर्धनाची शपथ देऊन नैसर्गिक ,मानसिक व वैचारिक प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी तुळशीचे रोप एकमेकींना भेट देऊन महिलांनी हळदीकुंकू सारख्या गोष्टींच्या माध्यमातून चांगला संदेश समाजात पसरवू शकतात , तसेच सामाजिक बांधिलकीचे प्रत्येकाने भान ठेवून स्त्री जन्माचे स्वागत करावे अन्यथा मुलींची कमी होणारी संख्या निश्चितच चिंताजनक आहे आणि जर भविष्यात मुलगीच राहिली नाही तर उद्याची जन्म देणारी माताच राहणार नाही ,माता म्हणजे आई , ममत्व माया , प्रेमाचे प्रतिक नाहीसे होईल असे झाले तर सामाजिक प्रदूषणात प्रचंड वाढ होईल सामाजिक विषमता वाढली तर संपूर्ण मानव जात व मानवता नाहीशी होईल की काय अशी भिती याप्रसंगी व्यक्त केली कारण मागील 20 ते 22 वर्षातील स्त्रीभ्रूणहत्यांचा आकडा पोटात गोळा आणणारा आहे , जवळजवळ दीड कोटीच्या आसपास  स्त्रीभ्रूणहत्या झालेल्या आहेत.. हे सामाजिक वातावरण गडुळ होण्यास कारणीभूत आहे, त्यासाठी स्त्री जन्माचे स्वागत प्रत्येकाने करावे अशी उपस्थितांना विनंती केली आपण सर्व पर्यावरण प्रेमींनी अशा प्रकारच्या सकारात्मक विचारांचा संदेश समाजात पसरवला पाहीजे अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. याचे महत्व पटवून देताना आईच्या गर्भातील जन्माला न आलेल्या मुलीची कहाणी कवितेद्वारे सांगून सर्व उपस्थित पर्यावरण प्रेमींचे हृदय हेलावून सोडले. तिसरे वैचारिक प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी योग साधना ध्यानधारनेचे महत्व पटवून दिले प्रत्येकाने आपल्या स्वार्थासाठी तरी मानसिक व वैचारिक सौख्य अबाधीत ठेवण्यासाठी पंधरा मिनिटे ध्यानधारणा करावी असे निक्षून सांगितले तसेच प्रजापिता ब्रम्हकुमारी संस्था व भारत सरकारच्या वतीने “कल्पतरू” सारख्या कार्यक्रमाचे आयोजन जागतिक पर्यावरण दिनापासून 5 जून ते 25 ऑगस्ट 2022 पर्यंतच्या 75 दिवसांच्या कालावधीत करून प्रत्येकाने 75 रोपांचे रोपण करून त्यांचे संवर्धन करण्याची मोहीम हाती घेतली व त्याचा परिणाम आजपर्यंत 40 लाख वृक्षांची विक्रमी लागवड झाली असे सांगितले. पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे प्रत्येकाने त्यामध्ये सहभागी होऊन आपले पुढील जीवन सुखमय करावे असा महत्वपूर्ण संदेश त्यांनी दिला. हे निसर्ग व पर्यावरण मंडळाचे संमेलन यशस्वी होण्यासाठी सर्व सहभागी पर्यावरण प्रेमी तसेच, साई संस्थानच्या कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानाईत मॅडम, सर्व पदाधिकारी , कर्मचारी यांचे महत्वाचे योगदान लाभले शेवटी आभार कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन करणारे वृक्षमित्र धीरज वाटेगावकर यांनी मंडळाच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे व 28 जिल्ह्यातून आलेल्या निसर्ग व पर्यावरण प्रेमींचे आभार मानले .
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button