सातारा नगरपालिका शिक्षकांच्या बदल्याने पालक व गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये समाधान.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
सातारा नगरपालिका शिक्षकांच्या बदल्याने पालक व गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये समाधान.
सातारा दि: छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहरांमध्ये नगरपालिका शिक्षण मंडळ व शिक्षण क्षेत्रा बद्दल आपुलकी असणाऱ्या प्रशासन अधिकाऱ्यानी सातारा नगरपालिकेने शिक्षकांची ऑनलाईन पद्धतीने शासकीय नियम पाळून पारदर्शकतेने बावीस शिक्षकांच्या बदली केल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.
सातारा नगरपालिकेमध्ये शिक्षण क्षेत्रात चांगल्या पद्धतीने शिक्षकांनी काम केल्यामुळे सातारा नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या कामकाजात बदली पात्र शिक्षकांना सोईची बदली मिळाली आहे . असे असताना जाणीवपूर्वक दिशाभूल करून शिक्षकांबद्दल वेगळे वातावरण करण्याचा शालाबाह्य प्रयत्न होत आहे. हे निषेधार्थ असून एकाच शाळेमध्ये दहा ते वीस वर्षे कार्यरत राहून अनेकांवर अन्याय करण्याची मालिका काहींनी सुरू केली होती. त्याला पायबंद घालण्याचे काम सातारा नगरपालिका प्रशासन अधिकाऱ्यांनी केले. तसेच त्यांना पालक व प्रतिष्ठित नागरिकांनीही मोलाची साथ दिली आहे.
शासनाने आधार कार्ड सक्तीचे केल्यामुळे संच मान्यता गतीने करण्यासाठी इतर शाळांमध्ये रिक्त पदावर त्यांची तात्काळ समायोजना करणे गरजेचे होते. ती गरज पूर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी हातभार लागणार आहे. सातारा नगरपालिकेची हद्द फार मोठी नाही .त्यामुळे कोणाला कोणताही त्रास होणार नाही किंबहुना सातारा शहरांमध्ये ज्ञानदानाचे पवित्र काम करताना नेहमी छत्रपतींची राजधानी आहे. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण मुख्यालय आहे. त्याचबरोबर घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण ज्या भूमीत झाले त्या भूमीमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये परिवर्तन होत आहे. ही आनंदाची बाब आहे .या परिवर्तनामध्ये व शिक्षकांच्या बदल्यांमध्ये कोणीही नाराज नाही .कुठलाही सावळा गोंधळ नसून शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे व पारदर्शक बदल्या झाल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.
शिक्षण मंडळाच्या शाळेतील विद्यार्थी उपस्थिती घटली आहे.त्याला चुकीच्या पद्धतीने पाठराखण करणारी प्रवृत्ती जबाबदार आहे. मोठ्या नेत्यांची नावे घेऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे चुकीचे असल्याचे काही पालकांनी सागितले.तसेच शिक्षक संघटनांनी ही या बदली संदर्भात राजकारण विरहित पारदर्शक बदल्या केल्याने समाधान व्यक्त केले आहे.
——————————————————-