कोपरगाव:-प्रहार पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे कोपरगाव तालुक्यातील करंजी बु.गावातील अनाथ महिलेला मिळाले हक्काचे घर.
प्रतिनिधी वसंत काळे अहमदनगर:-9767653309

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
————–
श्रीमती मंगलाबाई कारभारी आहेर मौजे करंजी बु!! ता कोपरगाव , जिल्हा अहमदनगर या ४९ वर्षाच्या अनाथ आदिवासी समाजाच्या आजीबाई आहेत . अत्यंत भयावह बिकट परिस्थितीमध्ये जीवन जगत होत्या . राहायला घर नाही तसेच खायला दोन वेळचे जेवण नाही , आणि मुले-बाळे नसल्याने कोणाचा आधारही नव्हता. सध्या ही महिला निवाऱ्या-अभावी मंदिरात वास्तव्य करून आपला गुजारा करत आहे. अशा निराधार आजीबाईची परिस्थिती खुप वाईट आहे करंजी गावामधे या महिलेचा जन्म झाला ४९ वर्षा पासुन त्या करंजीत राहतात त्यानी घरकुल करता करंजी ग्रामपंचायत मधे खुप वेळा अर्ज केली विनंती केली की मला घरकुल द्या पण ग्रामपंचायत ने त्याना सागितल तुमचा जातीचा दाखला घेऊन या तेव्हा घरकुल देऊ. पण त्यांना जातीचा दाखला मिळावा या करता कोणी मदत करत नव्हते. जेव्हा हि महिला प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे यांना भेटली.व मंगलबाई आहेर यांनी जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे व प्रहारचे सर्व पदाधिकरी यांना सर्व हकीगत सागितली व संजय शिंदे व प्रहार सर्व पदाधिकारी यांनी तात्काळ दखल घेत तहसिल ऑफिस प्रांत ऑफिसला पाठपुरावा केला मंगलबाई कारभारी आहेर यांना जातीचा दाखला मिळुन दिला त्या वेळी मंगलबाई आहेर यांनी जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे व सर्व प्रहार पदाधिकारी यांचे खुप आभार मानले.व आता प्रहारच्या या महिलेला घरकुल मिळावे या मागणीला यश येऊन सदर महिलेचे घरकुलाचे बांधकामही चालू झाले आहे.या सर्व कार्यासाठी प्रहारच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सदर महिलेने आभार मानले.या सर्व कार्यात श्री.संजय शिंदे,श्री.अभिजित कालेकर,श्री.कराळे सर,श्री.संदीप क्षीरसागर,श्री.दिनेश शेळके,श्री,वसंत काळे,श्री.नितीन भन्साळी व इतर सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.