कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव माण अग्रो प्रोसेसिंग साखर कारखाना यंदा नऊ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार__माजी आमदार प्रभाकर घार्गे.

प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.

खटाव माण अग्रो प्रोसेसिंग साखर कारखाना यंदा नऊ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार__माजी आमदार प्रभाकर घार्गे.

मायनी प्रतिनिधी___गतवर्षी खटाव माण ऍग्रो प्रोसेसिंग कारखान्याचे आठ लाख मॅट्रिक टन उद्दिष्ट अडचणीच्या काळात पूर्ण झाले परंतु यंदा नऊ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याची उद्दिष्ट ठेवले असून यंदा दोनशे रुपये जादा दर देणार असून पुढच्या वर्षी इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभ करणार असल्याचे असल्याने यंदा दिवाळीसाठी शेतकऱ्यांना बोनस देणार असल्याचेही माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी 22- 23 सालातील चतुर्थ गणित हंगाम शुभारंभ प्रसंगी कारखाना स्थळावरून बोलत होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कराड अर्बन बँकेचे कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी होते यावेळी बँकेचे अध्यक्ष सुभाषराव एरम उपाध्यक्ष समीर जोशी कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव उपमुख्य कार्यकारी अधिकारी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे डॉक्टर दिलीपराव बेळगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी विक्रम बाबा घोरपडे यांनी प्रमुख पाहुण्यांचे श्रीफळ पुष्पहार देऊन स्वागत केले व गणित हंगामाचा आढावा घेतला आपल्या मनोगत यामध्ये संग्राम घोरपडे कार्यकारी संचालक यांनी कारखान्याची स्थिती मजबूत असून सुरुवातीला तीन लाख मॅट्रिक टन उसाचा गाळप करणारा हा कारखाना यंदाच्या वर्षात नऊ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार आहे. मागील वर्षी आठ लाख मॅट्रिक टन उसाचे गाळप झाले. कराड अर्बन बँक ही आमची लीड बँक असल्याचे सांगितले कारखान्याचे को चेरमन मनोज दादा घोरपडे यांनी आपल्या भाषणात दररोज पाच हजार मॅट्रिक टन उसाचे गाळप करणार असून कराड अर्बन बँकेने समाजातील आमची पत पाहून आम्हास कर्ज दिले असल्याचे सांगून त्यांचा एकही हप्ता एक तारखेच्या पुढे गेला नसल्याचे सांगितले नंतर झालेल्या भाषणात डॉक्टर येळगावकर यांनी सांगितले की खटाव माणच्या माळावर माळावर कारखाना होईल असे कुणाला स्वप्नात देखील वाटत नव्हते पण प्रभाकर घार्गे आणि त्यांच्या टीम ने केलेल्या कार्याचे कौतुक आम्हाला आहे यापुढे आम्ही चांगल्या लोकांना राजकारण पुढे आणून स्थिर करणार आहोत यावेळी कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाषराव एरम यांनी गळीत हंगामास शुभेच्छा दिल्या आपल्या भाषणात अर्बन कुटुंब कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी यांनी सांगितले की संग्राम घोरपडे यांच्याकडे तंत्रज्ञान आहे घोरपडे यांच्याकडे मार्केटिंग आहे तर प्रभाकर घार्गे त्यांच्याकडे अर्थव्यवस्था आहे यामुळे तिन्हींचा संगम झालेला आहे यामुळे बँकेने दिलेले कर्ज सुरक्षित आहे या कार्यक्रमात कृष्णा शेंडगे महेश घार्गे मंगलाताई घोरपडे इंदिराताई घार्गे मंगल ताई घोरपडे अजित सिंहासने अभय कुमार देशमुख सचिन शेख माळवे महेश पाटील चंद्रकांत पाटील रवीशेठ काळे भरत शेठ जाधव शिवाजी सर्वगोड
किसन जगदाळे नवल थोरात तसेच शेतकरी हितचिंतक ऊस तोडणी कामगार वाहतूकदार उपस्थित होते प्रत्येक गावातील एका जोडप्याच्या हस्ते उसाची मोळी टाकण्यात आली शेवटी प्रीती घार्गे त्यांनी आभार मानले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

2 Comments

  1. साहेब,अटल पेन्शन योजना महिना ग्राहकांच्या खात्यात कमी होत होते, ज्यांनी ही स्कीम मेल्यावर वारसदार म्हणून पण ज्यावेळी आरबीआयच्या निर्णयानंतर आता खात्यात पैसे कमी होत नाही पण जे पैसे साधारणपणे एक ते दीड वर्षासाठी चालू होती ते पैसे कशे मिळणार त्याबद्दल माहिती हवी आहे, आपणास व आपल्या टीमला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply to RPS STAR NEWS Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button