सातारा:-आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी अग्नि प्रतिबंधक यंत्रणा राबविणे काळाची गरज.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.
ही आग दुर्घटना १०० % घडू न देणारी सुरक्षा यंत्रणा आपल्या देशामध्ये गॅससेफ इंडिया कंपनी व सप्तर्षी प्रोसेस प्रा. लि. राजकोट यांचे कडून तयार केली जात असून ती आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानांकन प्राप्त असलेली (ॲक्टीव्ह फायर प्रोटेक्शन)अग्नि-प्रतिबंधक यंत्रणा जी एल.पी.जी. व वीज क्षेत्रात आग लागूच देत नाही. सदरील सुरक्षा यंत्रणेची अंमलबजावणी ही
*आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ व दि.२२/०६/२०१२ रोजीचा नगर विकास खाते शासन निर्णया प्रमाणे सर्व इमारतींमध्ये लावणे नियमीत केले असताना त्याची अंमलबजावणी केली जात नाही, व आगीच्या दुर्घटनांना सामोरे जावे लागत आहे. इमारतींमध्ये फायर फायटिंग (*ॲक्टीव्ह फायर एक्सटिंगविशर*) ही यंत्रणा लावली जाते जी आग लागल्यानंतर आग विझविण्याचे काम करते तथापी ती आग अग्निशमन दलास नियंत्रणात आणणेयासाठी / विझविणासाठी पाचारण करावे लागते कारण इमारतीमध्ये बसविण्यात आलेली अग्निशमन यंत्रणा कशी वापरावी याची माहीती रहिवाशी यांनी नसल्याने त्याचा वापर होत नाही व आग भडकत राहते.
लागलेली आग ही विझविण्यापेक्षा ती आग लागू न देणे महत्वाचे आहे.
मंत्रालयामध्ये दि २१/६/२०१२ रोजी व नुकतीच दिल्ली येथे घडलेली आग दुर्घटना व २६ जणांचा मृत्यु सुध्दा टाळता आला असता पण ॲक्टीव्ह फायर प्रोटेक्शन चा अभाव हे त्याचे प्रमुख कारण आहे.
राज्यातील सर्व शासकीय इमारती, सदनिका, खाजगी निवासस्थाने ही आग दुर्धटने घडणे पासून सुरक्षित सुरक्षित करण्यासाठी व राहण्यासाठी ती यंत्रणा अंमलात आणावी असे मत मांडतो व सुरक्षा ही प्रथमस्तरीय आहे याचा विचार करून त्याची अंमलबजावणी करावी असे मत मांडतो.
आपला विनित
ॲड विकास बा.पाटील शिरगांवकर
सुरक्षा प्रणाली कार्य
लिमका बुक नॅशनल रेकॅार्ड विजेता
सातारा