सातारा:-वाखरी ता. फलटण येथील शाळेच्या दुरुस्तीसाठी विद्यार्थी व पालक उतरले साताऱ्यातील रस्त्यावर.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
वाखरी ता. फलटण येथील शाळेच्या दुरुस्तीसाठी विद्यार्थी व पालक उतरले साताऱ्यातील रस्त्यावर.
सातारा दि: शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते. त्याची प्रचिती फलटण तालुक्यात पाहण्यास मिळाली. आज शाळेच्या दुरुस्तीसाठी फलटण पासून सातारा जिल्हाधिकारी व सातारा जिल्हा परिषद कार्यालय इथपर्यंत विद्यार्थी व पालक आले होते. शाळेची इमारत दुरुस्ती व इतर सुविधा द्यावी या मागणीसाठी त्यांनी निवेदन दिले.
याबाबत माहिती अशी की १९६२ साली लोकवर्गणी व श्रमदानातून वाखरी ता. फलटण येथील ग्रामस्थांनी श्रीराम एज्युकेशन सोसायटी मार्फत शैक्षणिक सुविधा मिळावी. यासाठी या संस्थेला ही दगडी इमारत दिली होती. सध्या या इमारतीची दुरवस्था झाली असून या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना, हवेशीर वर्ग , स्वच्छतागृह शौचालय व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. शाळेच्या इमारतीची अवस्था धोकादायक झालेल्या आहे .
या शाळेत शिक्षण घेताना गरीब व कष्टकरी विद्यार्थ्यांना नाईलाज धोकादायक इमारत असलेल्या शाळेत शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेचा गैरवापर होत आहे. या संदर्भातही शिक्षणाधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर केलेला आहे .परंतु याबाबत अद्यापही शाळेच्या सुविधा बाबत सुधारणा झालेली नाही. इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतचे वर्ग गावातील सार्वजनिक मंदिर व समाज मंदिरात बसवली जातात. प्रयोगशाळा, खेळाचे साहित्य, संगणक, ग्रंथालय याची सुविधा नसल्याने पालकांनी स्वातंत्र्य दिन दिनांक १५ ऑगस्ट रोजी शिक्षणावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
खरं म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक बदल होत असताना नागरिक सुविधा देणे. हे अपेक्षित आहे .सध्या युगपुरुषांच्या नावे असलेल्या छत्रपती शिवाजी हायस्कूल पंचक्रोशी वाखरी ता. फलटण जिल्हा सातारा या शाळेची दुरावस्था झालेली आहे. एखाद्या पडक्या वाड्यासारखी त्याची स्थिती झाल्यामुळे काही पालक व शिक्षकांनी थेट फलटण मधून खाजगी वाहनाने साताऱ्यातील जिल्हा परिषद कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी येऊन आपली व्यथा मांडत आहे. सदरच्या संस्थाचालकांनी या इमारतीची देखभाल व दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. सध्या पावसाळ्यात जर पावसाचे प्रमाण वाढले तर या इमारतीला धोका होऊ शकतो. त्यापूर्वीच या इमारतीची दुरुस्ती करावी .अशी मागणी पालकांनी केलेले आहे.
या वेळेला वाखरी गावचे प्रथम नागरिक सरपंच शुभांगी शिंदे ,सदस्य योगिनी गायकवाड, कुंदा बनकर, रंजना निंबाळकर विजय काकडे जगन्नाथ जाधव सचिन ढेकळे यासह पाचवी ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. दरम्यान शाळेच्या गणवेशात आलेल्या मुलांनी अखेर सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानात दुपारी भोजन केले. परंतु, त्यांच्या पिण्याच्या पाण्याची कोणती सुविधा नव्हती. ही बाब प्रकर्षाने जाणवली. सातारा जिल्हा परिषदेच्या समोर विद्यार्थी व ग्रामस्थ आल्याने काही पत्रकारांनी फोटो काढण्याचा प्रयत्न केला परंतु, त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थांबविण्यास सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून अनेकदा फोटो काढण्यात आले पण, आताच विरोध का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
——————————————————————–
वाखरी ता. फलटण येथील शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी सातारा येथे निवेदन देण्यात देण्यासाठी आलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी (छाया- अजित जगताप सातारा)