मायणी:-महात्मा गांधीजींचे विचार आत्मसात करणे हीच काळाची गरज.
प्रतिनिधी दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
प्रतिनिधी दिलीप पुस्तके सातारा:-9890318605.
महात्मा गांधीजींचे विचार आत्मसात करणे हीच काळाची गरज____संजय साळुंखे मायणी प्रतिनिधी__महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांनी सत्य अहिंसा त्याग या गोष्टी संपूर्ण जगाला शिकवल्या पण आपल्याच देशात नथुराम गोडसे याचा काही घटक जयजयकार करीत आहे ही प्रवृत्ती सोडून विश्ववंदनीय महात्मा गांधी यांचे विचार आत्मसात करणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे स्पष्ट मत महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे ओबीसी सेलचे उपाध्यक्ष संजय हनुमंतराव साळुंखे यांनी कलेढोण येथे व्यक्त केले. स्वातंत्र्य महोत्सवाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात व्यर्थ न हो बलिदान या कार्यक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खटाव तालुका काँग्रेस कमिटी महिला अध्यक्षा सौ सुजाता महाजन होत्या प्रारंभी जयंत वाघमारे सर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात नऊ ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत स्वातंत्र्याच्या अमृत्व महोत्सवी कार्यक्रम कसा राबवला या विषयी सविस्तर माहिती दिली त्या नंतर भारत माझा देश,स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान, मी तिरंगा बोलतोय, मी भगतसिंग बोलतोय या विषयावर मनोज सानप, अर्जुन ढोले ,आर्यन ढोले, समृद्धी सानप या विद्यार्थ्यांनी ओजस्वी भाषणे केली त्यानंतर राजेंद्र लोखंडे व प्राध्यापक दिलीप पुस्तके सौ निर्मला साळुंखे व अध्यक्ष सुजाता महाजन यांनी आपली मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमास मजनू भाई मुलाणी उपाध्यक्ष सातारा अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटी सलमान भाई उपाध्यक्ष खटाव युवक काँग्रेस निर्मलाताई साळुंखे, बाळासाहेब दबडे ,राजेंद्र लोखंडे गुलमोहमद शिकलगार, शरद बाबर ,ज्येष्ठ मुख्याध्यापक मालोजी कुंभार ,दबडे ,लोखंडे तसेच मुख्याध्यापक श्रीमंत सानप ,दीपक नामदे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी प्रमोद लावंड यांनी आभार मानले.