ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनानंतर एकलव्य भिल्ल सेनेचे आमरण उपोषण मागे.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर :-7507469042
लोहगाव( वार्ताहर)
श्रीरामपूर तालुक्यातील श्रीरामपूर बेलापूर रोडवरील अतिक्रमण त्वरित हाठावले जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनंतर आज श्रीरामपूर प्रांत अधिकारी कार्यालया समोर सुरू करण्यात आलेले एकलव्य भिल्ल सेनेचे आमरण उपोषण मागे घेण्यात आले.
श्रीरामपूर बेलापूर रोडवर येथील दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. या अतिक्रमणामुळे इथे या रोडवर मोठी कोंडी निर्माण झाली होते. आणि या वाहनांच्या कोंडी मुळे येथे अपघात घडत आहेत. आणि याच अतिक्रमणामुळे श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील आदिवासी भिल्ल कुटुंबातील तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी आंदोलनाची भूमिका घेऊन शुक्रवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी प्रांत अधिकारी कार्यालय श्रीरामपूर समोर श्रीरामपूर बेलापूर रोड वरील बेकायदेशील अतिक्रमण त्वरित हटवून , अतिक्रमण धारकांवर गुन्हा दाखल करा या प्रमुख मागणी साठी तालुक्यातील भिल्ल समाज बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली व अहमदनगर जिल्हा परिषद सदस्य भारत जाधव यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेकडो आदिवासी उपोषण स्थळी दाखल झाले. परंतु आठ दिवसांच्या आत श्रीरामपूर बेलापूर वरील अतिक्रमण हटवून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लिखी आश्वासन मिळाल्याने आज एकलव्य भिल्ल सेनेचे उपोषण मागे घेण्यात आले. परंतु आठ दिवसात अतिक्रमण हटवून संबंधितांवर कारवाई न झाल्यास पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर आहिरे यांनी दिला.यावेळी आदिवासी समाज्याचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
श्रीरामपूर तालुक्यातील श्रीरामपूर बेलापूर रोडवरील अतिक्रमण त्वरित हाठावले जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनंतर आज श्रीरामपूर प्रांत अधिकारी कार्यालया समोर सुरू करण्यात आलेले एकलव्य भिल्ल सेनेचे आमरण उपोषण मागे घेण्यात आले.
श्रीरामपूर बेलापूर रोडवर येथील दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. या अतिक्रमणामुळे इथे या रोडवर मोठी कोंडी निर्माण झाली होते. आणि या वाहनांच्या कोंडी मुळे येथे अपघात घडत आहेत. आणि याच अतिक्रमणामुळे श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील आदिवासी भिल्ल कुटुंबातील तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी आंदोलनाची भूमिका घेऊन शुक्रवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी प्रांत अधिकारी कार्यालय श्रीरामपूर समोर श्रीरामपूर बेलापूर रोड वरील बेकायदेशील अतिक्रमण त्वरित हटवून , अतिक्रमण धारकांवर गुन्हा दाखल करा या प्रमुख मागणी साठी तालुक्यातील भिल्ल समाज बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली व अहमदनगर जिल्हा परिषद सदस्य भारत जाधव यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेकडो आदिवासी उपोषण स्थळी दाखल झाले. परंतु आठ दिवसांच्या आत श्रीरामपूर बेलापूर वरील अतिक्रमण हटवून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लिखी आश्वासन मिळाल्याने आज एकलव्य भिल्ल सेनेचे उपोषण मागे घेण्यात आले. परंतु आठ दिवसात अतिक्रमण हटवून संबंधितांवर कारवाई न झाल्यास पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर आहिरे यांनी दिला.यावेळी आदिवासी समाज्याचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते