सातारा:-सातारमध्ये तापमानाने चाळिशी गाठल्यामुळे प्रचार यंत्रणेलाही बसल्या झळा…..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
सातारमध्ये तापमानाने चाळिशी गाठल्यामुळे प्रचार यंत्रणेलाही बसल्या झळा…..
सातारा दि: लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या प्रसारमाध्यम व सोशल मीडियातून वाहत असले तरी नैसर्गिक तापमानाने चाळिशी गाठली आहे. प्रचार यंत्रणेला उन्हाच्या झळा सोसवेना आणि उमेदवार व प्रचारक घराबाहेर पडेना.. असे चित्र सध्यातरी सातारा जिल्ह्यात दिसत अजून उमेदवारी निश्चित झाली नसल्याने अनेक जण त्याचीही वाट पाहत आहेत. अजून उन्हाळा बाकी असून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानाने चाळिशी गाठली आहे. प्रत्यक्षात मतदानाला जाईपर्यंत हेच प्रमाण ४२ ते ४५ पर्यंत पोचले तरीसुद्धा सातारकर मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतील. असा विश्वास सर्वांनाच आहे.
यंदाच्या मोसमामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले आहे .महामार्ग व सार्वजनिक विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेले आहे. या वृक्षतोडीमुळे प्रवास करताना दिसणारी हिरवळ नष्ट झाली असून रणरणत्या उन्हामध्ये ओस पडलेले रान- शिवार व रस्ते पाहून अनेकांना भूतकाळातील निसर्गरम्य व झाडे झुडपं चांगलीच आठवू लागली आहेत.
ज्यांनी निसर्गाची कदर केलेले नाही. त्यांना सुद्धा आता निसर्ग गटबाजी करण्याची कोणतीही संधी देत नाही. सबका साथ- सबका विकास या अर्थाने सर्वांना उन्हाळ्याच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. ज्यांच्या घरी व वार्तानुकूलित यंत्रणा आहे .त्यांचे सुद्धा विजेचे बिल वाढू लागलेले आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा आता आर्थिक फटका बसत आहे. सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजेपालात व पत्राच्या शेडमध्ये राहणाऱ्या अनेकांना जगणं असाह्य झाले आहे. परंतु त्याच्याशी सामना करण्याची नैसर्गिक शक्ती देवाने त्यांना दिलेली आहे. आजही गरिबांच्या झोपडीत व पालावर संध्याकाळच्या वेळी शिरणारा गारवा अनेकांना सुखद वाटत असतो. सध्या रस्त्यावरील वाहतूक कमी झाली असली तरी गरजे इतकेच लोक बाहेर पडत आहेत. विशेषता सकाळी सहा ते दहा आणि सायंकाळी पाच ते अगदी अकरा वाजेपर्यंत दिवसभर ची कामे उरकण्यात अनेक धन्यता मानत आहे.
तापमानात जसजशी वाढ येईल होईल तस तशा पद्धतीने शितपेय पिणाऱ्यांची संख्या ही वाढू लागली असून अनेकांना आता थंड आईस्क्रीम तसेच लिंबू सरबत, कोकम सरबत व थंड कलिंगड खाऊन काही वेळेला रांजण व माठातील गार पाणी पिऊन तहान भागवावी लागत आहे. अनेक ठिकाणी बाटलीबंद पाण्यातून स्वच्छ सरबत मिळत आहे तर इतर ठिकाणी सार्वजनिक नलिकेतील च पाण्यापासून सरबत तयार करत असल्यामुळे अनेक जण हे शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या सरबत पिण्यासाठी ठराविक ठिकाणी धाव घेत आहेत. शेवटी प्रत्येकाने आरोग्य जपले पाहिजे. कारण काही क्षणापुरतं गारवा मिळतो पण त्याचे दुष्परिणाम होऊन सर्दी- खोकला- पडस होण्याची शक्यता आहे. याची काळजी घेणे गरजेचे आहे .दरवर्षी निसर्ग बदलत असून माणूस सुद्धा स्वतःमध्ये बदल करत आहे. यंदाचे तापमान वाढल्यामुळे सुती कपडे यांना मोठी मागणी होऊ लागली आहे. निवडणुकीतील खादीचा ट्रेड कमी होऊन सुती कपड्यावर अनेक जण धाव घेऊ लागलेले आहेत.