ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-ज्येष्ठ नेते पवारसाहेब लायकी व आ. महेश शिंदे

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

ज्येष्ठ नेते पवारसाहेब लायकी व आ. महेश शिंदे

सातारा दि: लोकशाहीमध्ये जोपर्यंत न्यायालय दोषी ठरवत नाही. तोपर्यंत सर्वच आरोपी हे निर्दोष असतात. पण, व्यक्ती स्वतंत्र म्हणून लोकशाहीमध्ये उमेदवारी देणे क्रमप्राप्त आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे म्हणजे राष्ट्रवादीने आ. शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. त्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या माहितीच्या आधारे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. अशावेळी त्यांचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांची सातारा येथील लेक व्ह्यू हॉटेलच्या वर्तनुकुलित हॉलमध्ये भर पत्रकार परिषदेत आ. महेश शिंदे यांनी लायकी काढली आहे. लायकी या शब्दप्रयोगाने सातारा लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला मतदान करताना सुज्ञ मतदार यांच्या मतदानातून फायदा की तोटा होणार ? याबाबत आता राजकीय पटलावर दबक्या आवाजात चर्चा सुरू झालेली आहे.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, किसन वीर आबा यांच्याबरोबरच अनेक दिग्गज नेत्यांनी व त्यांच्या समर्थकांनी निवडणुकीत प्रचार यंत्रणा राबवली. पण कधीही विरोधकांबध्दल अपशब्द वापरला नाही. स्वर्गीय चव्हाण साहेब यांच्या बद्दल आक्षेपार्य भाषण केल्यानंतर आचार्य अत्रे यांना सत्य माहिती समजल्यानंतर त्यांनी जाहीर माफी मागून दिलगिरी व्यक्त केली होती. स्वर्गीय चव्हाण साहेब यांच्या बद्दल आदरणीय डॉ. शालिनीताई पाटील यांनी एकेरी उल्लेख केला. त्यावेळी सुद्धा स्वर्गीय चव्हाण साहेब यांनी थोरली भावजय आईप्रमाणे असते अशा शब्दात त्यांचा मान राखला होता.
आज राजकारणातील घसरत्या पातळीवर व्यक्त होणे गरजेचे आहे. अन्यथा येणारी पिढी ही आपणास माफ करणार नाही. लोकसभा निवडणुकीत मध्ये संसद भवन अनुषंगाने येणारे विषय हे आंतरराष्ट्रीय व देश पातळीवरील धोरण ठरवणारे असते. प्रचार निमित्त त्याची सविस्तर माहिती मतदारांपर्यंत पोहोचवणे. हा त्यामागील हेतू व उद्दिष्ट असतो. पूर्वी देश पातळीवरील नेत्याचे विचार ऐकण्यासाठी लोक जाहीर सभेला गर्दी करत होते. आणि हे विचार घेऊन विचारपूर्वक मतदान करत होते.
आज प्रसार माध्यमांची कवाडे खुली झालेली आहेत. स्काय इज लिमिट असं त्याचं वर्णन केले जात आहे. त्यामुळे गल्लीबोळात केलेले वक्तव्य हे इंटरनेट व सोशल मीडियाच्या माध्यमातून क्षणात जगभर जात आहे. त्या अर्थाने केलेल्या वक्तव्य आता महाराष्ट्रभर पोहोचले आहे. सातारा लोकसभा मतदार संघातील माथाडी कामगार नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी मुंबईतील हातगाडी वाले व माथाडी यांच्यासाठी हक्काचे विचारपीठ निर्माण व्हावे. यासाठी माथाडी कामगार चळवळ उभी केली. या चळवळीला चेहरा देण्याचे काम अनेक मातब्बर काँग्रेस मंडळींनी केले आहे. आज राजकीय परिस्थिती बदलली असून माथाडी कामगार संघटनेमध्ये आता बिगर काँग्रेस विचारधारा वाहू लागलेले आहे. हे विचारधारा जोपासण्याचे काम कार्यकर्त्यांना करावे लागत आहे. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी सुद्धा टीका केली पण लोकशाहीच्या चौकटीत राहूनच त्यांनी शब्दप्रयोग केला. समय सूचकता दाखवून महा विकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे. हे अधोरेखित केले.
स्वर्गीय चव्हाण साहेब यांची फार मोठी उंची आहे. त्यांच्या उंचीपर्यंत पोहोचण्याचे भाग्य हे ज्या मुठभर लोकांना मिळाले आहे. त्यामध्ये निश्चितच शरदचंद्र पवार साहेब यांचा उल्लेख करावा लागेल. राजकीय पटलावर स्वर्गीय चव्हाण साहेब यांचे मानसपुत्र अशी शरदचंद्र पवार साहेब यांची ओळख आहे. ती कधी पुसली गेलेली नाही. अशा वेळेला या थोर नेत्यांची लायकी काढणे म्हणजे आपण खूप मोठे पराक्रमी वाक्य बोललो आहे. असे काहींना वाटत असले तरी ज्या सुसंस्कृत पक्षातून आलेल्या लोकांनी हे वाक्य जाहीर पत्रकार परिषदेत वापरून काय साध्य केले ? हे सात जून रोजी होणाऱ्या मतदानानंतर समजेलच. तोपर्यंत त्याची प्रतीक्षा करणे हाती आहे.
सातारा लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय योजना राबवून सातारच्या विकासासाठी प्रयत्न करणे हे गरजेचे आहे. पर्यटन वाढीसाठी खूप मोठा वाव आहे. यासाठी एक्सपर्ट प्रोमोशन प्रोग्राम व केंद्रीय पर्यटन विकास योजना राबवण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. महागाई, वाढती बेरोजगारी व धर्मनिरपेक्षता या गोष्टी या सर्वच राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी आहे. पण यातून मार्ग काढून दगडापेक्षा वीट मऊ असे समजून धोरण राबवावे लागते. लोकसभेच्या प्रचारात अशा धोरणांपेक्षा माथाडी कामगार चळवळीत काय घडते ? काय घडू नये ? त्याचबरोबर नवी मुंबई येथील शेती उत्पन्न बाजार समितीत चाललेल्या कारभाराबाबत विरोधी पक्षाच्या उमेदवाराला संस्थेच्या पिंजऱ्यात उभे करणे? आणि हे करत असताना ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांची लायकी काढणे. हा प्रचाराचा मुद्दा असला तरी अनेकांना मनापासून ते पटले नाही. हे सांगण्याचे धारिष्ट आता वरिष्ठ नेत्यांनी व महायुतीच्या उमेदवारांनी सुद्धा जाहीरपणाने सांगितले पाहिजे. महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी अत्यंत संयम राखून विरोधकांचा समाचार घेतलेला आहे. त्यांच्या दौऱ्याला मतदार व लोकांची गर्दी जमत आहे .ते राजेशाहीतले राजे आहेत पण लोकशाहीतील राजे म्हणून त्यांना मानसन्मान मिळत आहे. याचा आ. महेश शिंदे यांना विसर पडू नये हीच इच्छा आहे. आमदार महेश शिंदे हे स्टार प्रचारक आहेत. त्यांनी केलेल्या विकास कामावर मते मागावेत असा एक मतप्रवाह निर्माण झालेला आहे.
आदरणीय कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे व्यक्तिगत उमेदवार असते व त्यांच्यासमोर आ. शशिकांत शिंदे उभे असतील तर त्यांनी बेशक व बिनधास्त त्यांच्यावर टीका करून मत घ्यावीत. मतदार सुद्धा मत देतील. पण, ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांची लायकी काढून आमदार महेश शिंदे सारख्या राजकीय जीवनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून सुरुवात केलेल्या नेत्यांकडून हे अपेक्षित नाही. त्यांच्या या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीला प्रचारासाठी आयतं कोलीत मिळालेले आहे. त्याचा ते निश्चितच वापर करतील. निषेधाची पत्रक निघतील. आंदोलने होतील. लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना आता आ. महेश शिंदे यांनी प्रचार निमित्त उभे केलेली यंत्रणा व केलेला प्रयत्न याच्यावर बोळा फिरवण्याचे काम करतील ? याचेही विश्लेषण केले जाईल. त्यामुळे एक हक्काचा आमदार असूनही महायुतीला किमान काही भागात सेट बँक बसेल असे दिसू लागलेले आहे.
स्वर्गीय चव्हाण साहेब यांच्या इतकेच स्वर्गीय शरदचंद्र पवार साहेब यांना मानणारा मोठा वर्ग सातारा जिल्ह्यात आहे. राजकारणाच्या पलीकडेही काही व्यक्ती या श्री पवार साहेब यांच्यावर प्रेम करतात. बहुदा महाविकास आघाडीचा उमेदवार पसंद नसेल पण आ. महेश शिंदे यांच्या वक्तव्याने नाराज झालेली मंडळी काय निर्णय घेतील. हे सुद्धा आता हळूहळू चर्चेचा विषय होऊ लागलेला आहे. अजून प्रचाराला अवधी आहे. केलेली चूक दुरुस्त करता येते. शेवटी प्रत्येक माणसाच्या हातून चूक होते. ते चूक सुधारण्याची सुद्धा पद्धत आहे. पण ती चूक लवकरात लवकर दुरुस्त झाली पाहिजे .

स्वर्गीय चव्हाण साहेब व शरदचंद्र पवार साहेब या मंडळींबद्दल वक्तव्य करण्यापेक्षा समोरच्या उमेदवाराच्या सार्वजनिक जीवनातील उणिवा दाखवणे. याला प्राधान्य द्यावे. असे आता स्पष्ट पणाने सांगावे लागत आहे. याचा विचार आता महायुतीचे प्रचार प्रमुख व त्यांच्याशी निगडित असलेल्या यंत्रणे करेल .हीच मापक अपेक्षा ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांना मानणारा वर्ग करत आहे. त्याकडेही लक्ष द्यावे असे सर्वांनाच वाटू लागलेले आहे.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button