शासनाने उभारलेल्या पाजर तलावात शेतकऱ्यांचे अतिक्रमण, चिमुरड्यांच्या शाळेचा प्रश्न.
प्रतिनिधी:-बाळासाहेब सरोदे :-9373299248

तालुका वैजापूर मौजे नालेगाव धोंदलगाव या रस्त्यामध्ये शासनाने पाझर तलाव केला आहे तरी काही शेतकऱ्यांनी त्या पाझर तलावात अतिक्रमण करून तार कंपाउंड करून शाळेत शाळेतील मुलांचा रस्ता अडवण्यात आला आहे हा रस्ता शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता म्हणून ओळखला जातो परंतु संबंधित शेतकऱ्यांचे जमिनीचे क्षेत्र पडीत आहे मुले शाळेत जाण्यास इच्छुक असून घरी बसलेली आहे वारंवार शेतकऱ्याच्या विनवण्या करून देखील सुद्धा हा संबंधित शेतकरी त्यांनी अतिक्रमण केलेले जागेवरून जाऊ देत नाही यासाठी शासन व प्रशासन यांच्या दरबारी शेतकऱ्यांनी कागदपत्रे पायपीट केली तरी देखील सरकार जागे व्हायला तयार नाही व या गरीब जनतेची प्रश्न सुटायला तयार नाही तरी शासनाने या शेतकऱ्यांना त्वरित रस्ता मोकळा करून द्यावा नाहीतर शेतकरी उपोषण किंवा आत्महत्या करण्यास तयारी दर्शवली आहे या शेतकऱ्यांना न्याय मिळेल व यांची शेती पुन्हा कसल्या जाईल हीच अपेक्षा धन्यवाद