सातारा:-धम्म व बाल संस्कार शिबीरांमुळे सुसंस्कारित पिढी घडत असते.
पत्रकार प्रतिनिधी महेश मोहिते सातारा:-76205 84904

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार महेश मोहिते सातारा:-
धम्म व बाल संस्कार शिबीरांमुळे सुसंस्कारित पिढी घडत असते.
सातारा :-बाबासाहेबांनी बुद्ध विचार दाखवले. त्यामुळे धम्म विचार बालकांना कुटुंबातून मिळाले पाहिजेत.शिवाय,बाल संस्कार शिबिरामुळे सुसंस्कारित पिढी घडत असते.असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य गौतम कांबळे यांनी केले.
जकातवाडी,ता.सातारा येथील चंद्रकांत खंडाईत यांच्या पंचशील निवासस्थानी संघनायक भन्ते अंगुलीमाल आणि त्यांच्या पवित्र भिख्खू संघाने भोजन दान करण्यासाठी भेट दिली.तेव्हा गौतम कांबळे मार्गदर्शन करीत होते.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक भागवत भोसले,तालुका सचिव ऍड. विजयानंद कांबळे,ऍड.विलास वहागावकर व अनिल वीर यांची प्रमुख उपस्थिती होती.
गौतम कांबळे म्हणाले, “विहारात/पुतळा परिसरात धम्म प्रबोधन होत असते.तेव्हा विशालदृष्टिकोन ठेवून वेळेवर उपस्थित राहून विधायक व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल केली पाहिजे.जन्म देणारा आपला बाप व घडवणारे दुसरे बाबासाहेब होत.”
बौद्धाचार्य वामन गायकवाड म्हणाले,”सम्राट अशोकाने आपल्या मुलांवर (महेंद्र व संघमित्रा) धम्म संस्कार शिकवल्याने त्यांनी प्रचार – प्रसारासाठी देश-विदेशात गेले होते.बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून केलेल्या कार्यामुळे समाजातील सर्व घटकांना न्याय दिला.अन्नदान सर्वश्रेष्ठ दान आहे.” चंद्रकांत खंडाईत म्हणाले, “धम्म चळवळ अधिकाधिक वाढीसाठी भारतीय बौद्ध महासभेचे शिलेदार कार्यरत आहेत.तेव्हा प्रत्येकांनी योगदान द्यावे.” धम्मपालन व आशीर्वाद गाथेने सांगता करण्यात आली.सदरच्या कार्यक्रमास श्रावनकुमार गँगमन (आण्णा), तानसेन कांबळे,सौ.पंचशीला खंडाईत,भैय्या व गुडी आदी राजेंद्र खंडाईत व त्यांचा परिवार,महादेव मोरे,मनोज वाघमारे,श्रीरंग वाघमारे,श्रामनेर, भिख्खू संघ,समता सैनिक दलाच्या कल्पना कांबळे, सुनीता गायकवाड, मनीषा पोळ आदी मान्यवर, उपासक व उपासिका उपस्थित होत्या.
फोटो : धम्मदेसना देताना गौतम कांबळे शेजारी भिक्खू संघ नायक भन्ते अंगुली माल व उपासक-उपासिका.