खटाव – माण साखर कारखान्याचा ५ वा गळीत हंगाम सांगता समारंभ उत्साहात.
उपसंपादक प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
उपसंपादक (ज्येष्ठ पत्रकार)प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक
खटाव – माण साखर कारखान्याचा ५ वा गळीत हंगाम सांगता समारंभ उत्साहात.
मायणी प्रतिनिधी- खटाव – माण अग्रो प्रोसेसिंग साखर कारखान्याचा ५वा गळीत हंगाम सांगता समारंभ उत्साहात संपन्न झाला. ५व्या गळीत हंगामात ६लाख १५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून ६लाख ८० हजार पोती साखर उत्पादन झाले. सदरचा कारखाना जानेवारीत बंद होईल असे सर्वांना वाटत होते परंतु सदर कारखाना सर्वांच्या योगदानाने १३५ दिवस चालला असून त्याची रिकव्हरी ११च्या वर आहे.यंदा ४०टक्के पाऊस कमी झाला असला तरी कारखान्याने आपले उद्दिष्ट गाठले आहे. प्रारंभी सर्वात जास्त ऊस उत्पादन करणारे शेतकरी,सर्वात जास्त वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक,तसेच सर्वात जास्त ऊसतोड करणारे कामगार यांचा पुष्पगच्छ,मेडल,रोख रक्कम देऊन कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक नलवडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. नंतर झालेल्या भाषणात कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे यांनी सांगितले की,पाचव्या गळीत हंगामासाठी संपूर्ण टीमने योग्य नियोजन केले होते,योग्य पद्धतीने गाळप केले होते,लोकांनी आर्थिक शिस्त पाळली त्यामुळे उसाचे बिल १५ दिवसात शेतकऱ्यांना दिले. या कारखान्याच्या सुयोग्य कामामुळे या कारखान्याला बेस्ट ओवर ऑल परफॉर्मन्स पुरस्कार मिळाला आहे असे सांगितले. कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रभाकर घार्गे म्हणाले,संकटातून पुढे जाणे व त्यातून बाहेर पडणे हे आमचे ध्येय आहे.साखर कारखाना हा हवामान,पाणी,निसर्ग,जागतिक बाजारपेठ,सरकारी धोरण यावर अवलंबून असते.यंदा लागवड कमी असूनही अपेक्षेपेक्षा बऱ्यापैकी गाळप झाले आहे. सर्व कर्मचारी,शेतकरी हे माझे कुटुंब आहे.याच पद्धतीने पुढील वर्षी कारखान्याचे गाळप करणार आहे तसेच डीस्टीलरी १५ दिवसात सुरु होणार आहे असे सांगितले. या कार्यक्रमासाठी संचालक महेश घार्गे, विक्रम घोरपडे,कृष्णत शेडगे मामा,मंगला घोरपडे,हणमंतराव घोरपडे,अजय सानप,शिवाजी शिंदे,अजय मोरे,विनायक गोसावी, सौ.समता घोरपडे,सौ.तेजस्विनी घोरपडे,सारंग शिंदे,विकास मोरे,सुभाष मोहिते व असंख्य कर्मचारी उपस्थित होते. शेवटी अशोक नलवडे यांनी आभार मानले.