कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माळेवाडी:-(श्रीरामपूर)-रंजलेल्या गांजलेल्या शेतकरी भक्तांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्यासाठी सरकारला परमेश्वर सदबुद्धी देवो –  शेतकऱ्यांचे महंत राम गिरीजी महाराज यांना साकडे.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

रंजलेल्या गांजलेल्या शेतकरी भक्तांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्यासाठी सरकारला परमेश्वर सदबुद्धी देवो –
शेतकऱ्यांचे महंत राम गिरीजी महाराज यांना साकडे.

माळेवाडी श्रीरामपूर प्रतिनिधी:-
मौजे शनिदेव गाव तालुका वैजापुर जिल्हा संभाजीनगर येथे साराला भेटचे मठाधिपती रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबाद व सराला बेट च्या परंपरेप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. अहिल्या नगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने अखंड हरिनाम सप्ताह भेट देऊन महाराजांचे आशीर्वाद व प्रसाद घेऊन महाराजांच्या चरणी लीन होऊन राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्याची सरकारला सदबुद्धी येऊ दे, अशा आशयाचे निवेदन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे, तालुका अध्यक्ष युवराज जगताप, डॉ. दादासाहेब अधिक, डॉ. विकास नवले, संतोष पटारे, इंद्रभान चोरमळ, दिलीप औताडे, शैलेश वमने, राजेंद्र चोरमल, राहुल चोरमल, अकबर शेख, ठकचद आढाव, गोरख पवार, कडू पवार, नारायण पवार आधी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिले.
समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने आपणास विनम्रपणे व भक्तीभावाने आपल्या चरणी लीन होऊन शेतकऱ्यांचीआर्त हाक सरकार पर्यंत पोहोचवण्याची विनंती महाराजांना केली, दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आपण हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार धर्म शास्त्राचा मोठा अभ्यास करून चालविला आहे. ब्रह्मलीन गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन नारायण गिरीजी महाराज यांचा वारसा आपण जपण्याचे कार्य करत आहात. आपल्या समाज प्रबोधन कार्याची ख्याती अहिल्यानगर, संभाजीनगर, नाशिकसह संपूर्ण राज्यात पसरली आहे. आपल्या समाज प्रबोधन हिंदूधर्म कार्यामुळे समस्त मानव जीवनातील नैराश्य घालविण्याचे कार्य आपण करत असून सप्ताह कार्यकाळात भक्तांमध्ये मोठे नवचैतन्य निर्माण होत आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून शेतकरी आणि शेतमजूर हा परंपरा असलेल्या संतांचा भक्त असलेने टिकून आहे.
मागील गेल्या चार दशकांपासून शेती धंदा हा सरकारच्या धोरणामुळे तोट्याचा झाला आहे. गेल्या चार दशकांपासून अनेक सरकारी आलीं व गेली .परंतु शेतकरी समस्या कमी न होता वाढच झालेली आहे. याबाबतचा परिणाम राज्यातील शेतकरी आत्महत्तेत वाढ झालेली आहे.
मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत शेतकरी संघटनेसह अनेक साधुसंतांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देऊन सत्तेत आणले होते. भाजपाचे देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे अजित पवार या तीनही नेत्यांनी सत्तेत आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आपल्या जाहीरनाम्यात आश्वासित केले होते. परंतु याबाबतचे आश्वासन सरकारकडून पाळले जात नाही. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमुक्ती साठी शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी नेते लोकशाही मार्गाने आंदोलने छेडत आहे. परंतु सरकार याबाबतची दखल घेताना दिसत नाही.
त्यामुळे सहाजिकच महाराज आपल्या वाणीमध्ये मोठी ताकद आहे. आपणाला सूचित करण्या इतकी आमची उंची नाही परंतु एक शेतकरीभक्त म्हणून शेतकरी संघटनेच्या वतीने प्रार्थना करत आहोत की,आपण राज्यातील शेतकरी व शेतमजूर यांच्या वतीने सरकारला राज्यातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्ती बाबत प्रबोधन केल्यास परमेश्वर सरकारला सद्गबुद्धी देऊनआपला सर्वसामान्य भक्त परिवार एक चांगले सन्मानाचे जीवन जगून मानव जीवनाचे सार्थक होऊन सुखावेल.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.


ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button