पारनेर:-सर्वसामान्यांना कधी ही वाऱ्यावर सोडणार नाही , प्रसंगी राजकारण सोडू – सचिन वराळ पाटील.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
सर्वसामान्यांना कधी ही वाऱ्यावर सोडणार नाही , प्रसंगी राजकारण सोडू – सचिन वराळ पाटील.

सुपा राजकुमार इकडे ( पारनेर)यांजकडून संदीप पाटील वराळ यांनी गेल्या ११ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या गरीबांची दिवाळी हा उपक्रम सातत्याने सुरूच ठेऊ , या उपक्रमातून सर्वसामान्य लोकांची दिपावली गोड होते , यांना आम्ही कधी ही वाऱ्यावर सोडणार नाही , वेळ प्रसंगी आम्ही राजक सोडू , पण हा उपक्रम बंद होऊ देणार नाही , अशी ग्वाही संदीप पाटील वराळ जनसेवा फाऊन्डेशन चे अध्यक्ष सचिन वराळ पाटील यांनी दिली.
” गरीबांची दिवाळी ” हा उपक्रम पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व निघोजचे माजी सरपंच दिवंगत संदीप वराळ पाटील यांनी खिश्यात पैसा नसतानाही लोकसहभागातून गेल्या ११ वर्षापूर्वी सुरू केला . त्यानिमित्त परवा बुधवारी निघोज येथील कपिलेश्वर मंगल कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या गरीब महिलांना एक साडी व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष सचिन वराळ पाटील पुढे म्हणाले की , या उपक्रमात कन्हैय्या परिवाराचे अध्यक्ष दिवंगत शांताराम मामा लंके यांचा सिंहाचा वाटा आहे . या उपक्रमातंगर्त आमची सर्व सामान्यांशी नाळ जोडली गेली आहे . भविष्यात ही आमचे वराळ कुटुंबीय या सर्व सामान्य लोकांबरोबर राहणार आहेत . यांना कोणालाही कसलीही अडचण आल्यास जनसेवा फाऊन्डेशन च्या कार्यालयात संपर्क साधावा . या उपक्रमाला कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण येऊ नये , म्हणून अशी अनेक कुटूंबे आहेत की , जी निघोज मध्ये राहत नाही , पण भरीव आर्थिक मदत करतात , तर काही गुप्त मदत ही करतात. माझ्या वराळ भावकीची ही मोठी मदत असते . गावाच्या विकासात आमच्या कुटुंबाचे मोठे योगदान आहे . पत्रकार बांधव ही आपापल्या लेखनी च्या माध्यमातून प्रामाणिक मदत करतात व सर्वदूर प्रसिद्धी देण्याचे काम करतात , असे गौरवोद्गार ही सचिन वराळ पाटील यांनी काढले आहे .
या उपक्रमाचे प्रास्ताविक मुंबई बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुनिल पवार करताना म्हणाले की , गेल्या अनेक वर्षांपासून गरीबांची दिवाळी हा उपक्रम संदीप पाटील वराळ राबवत असे , तदनंतर सचिन पाटील वराळ हे राबवत आहे . भावाने हा सुरू केलेला उपक्रम त्यांच्या नंतर भाऊ सचिन पाटील वराळ यांनी अखंड पणे सुरूच ठेवला . जोपर्यंत सुर्य, चंद्र , तारे आहेत , तो पर्यंत वराळ परिवार राहणार आहे , असे गौरवोदगार ही त्यांनी काढले.
तर पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्तात्रय उनवणे यांनी हा गरीबांची दिवाळी उपक्रम सुरू करण्यापासून ते आता पर्यंतचा ११ वर्षांचा इतिहास मांडला व वराळ परिवारा बद्दल गौरवोद्गार काढले .
यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी व निवड झालेल्या रुक्साना हवालदार , यांची पोलीस दलात निवड , कराटे प्रशिक्षक ओंकार रणसिंग , कराटे खेळाडू सई राऊत , विहा लामखडे , मेथली गायकवाड , परवेझ तांबोळी , आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू आर्यन ढवळे , सागर जगताप व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रखमाजी कापसे , युवक काँग्रेसचे पारनेर तालुकाध्यक्ष भास्करराव उचाळे , राळेगण थेरपाळ चे सरपंच पंकज कारखिले , तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेश लाळगे , उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे , कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुंदराव निघोजकर , यांनी मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाचे महत्व विशद केले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या पुष्पा वराळ पाटील , सरपंच चित्रा वराळ पाटील , भाजपा चे नेते अतुलराव माने , शालेय समितीचे अध्यक्ष अप्पा वराळ , पांडुरंग गाडगे , तुकाराम येवले , राहुल वराळ , भाऊसाहेब कोल्हे , गणेश लामखडे , विशाल डेरे , फिरोज शेख , भिमराव लामखडे , अस्लम इनामदार , निलेश घोडे , श्रीकांत वराळ , शरद पवार , रामा वराळ , भास्कर वराळ , शंकर वराळ , अर्जुन वराळ , सुमन बोंबले , बॉबी ताई गायखे , ठकाराम गायखे , रवि रणसिंग , पत्रकार बांधव इतर मान्यवर , ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




