वाई शहरात वाहतूक कोंडी ने नागरिक त्रस्त.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई शहरात वाहतूक कोंडी ने नागरिक त्रस्त.
वाई शहरात वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. त्यामुळे वाईकर नागरिक त्रस्त झाले आहेत. वाई मुख्य शहरी भागातील, बाजार पेठेतील सर्वच रस्त्यावर या वाहतुक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
नागरिक रस्त्यावर कुठे पण गाड्या लावतात, तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूस गाड्या लावल्या जातात यामुळे नेहमीच ही वाहतुकीची समस्या जाणवत आहे, रस्त्यावरील अतिक्रमणे हे सुद्धा याचे मुख्य कारण आहेआणि विशेषतः शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळीस तर रस्त्यांना चक्क जत्रेचे स्वरूप येत आहे आणि सगळ्यात गंभीर बाब म्हणजे नेमका यावेळेस किसनवीर चौक, गणपती चौक या गर्दीच्या ठिकाणी एक ही पोलीस उपस्थित नसतात त्यामुळे खूपच समस्या जाणवत आहेत.रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावलेल्या गाड्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
पी आर चौक ते किसनवीर चौक आणि मानाचा गणपती ते किसनवीर चौक हे रस्ते एकेरी वाहतुक केल्यास बऱ्याच समस्या सुटतील. त्यामुळे या वाहतूक कोंडी कडे पोलीस प्रशासन यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे तसेच नगरपालिका प्रशासनाने ही अतिक्रमण हटाव मोहीम लवकर हाती घ्यावी जेणेकरून ही समस्या सुटेल अशी मागणी नागरिकांतून होत आहे.