सातारा:-साताऱ्यात गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरासाठी व वारसांना नोकरी आणि विविध मागण्यांसाठी महामेळावा.
प्रतिनिधी - सागर पिसाळ खटाव:-7875411591

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण (8208717483
प्रतिनिधी – सागर पिसाळ (सातारा)
(खटाव)
साताऱ्यात गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरासाठी व वारसांना नोकरी आणि विविध मागण्यांसाठी महामेळावा.
मुंबई ला सोन्याची मुंबई बनवण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या गिरणी कामगारांना आता त्यांच्या हक्काच्या घरासाठी अजून किती वर्षे वाट पहावी लागणार?
नोकरी गेल्यानंतर गिरणी कामगार व त्यांचे वारस जवळपास 30 वर्षे हक्काच्या घरासाठी अजून ही संघर्ष करत आहेत. सरकारने आता तातडीने ठोस निर्णय घेऊन सर्व गिरणी कामगारांना मुंबई तच हक्काची घरे देण्यासाठी व गिरणी कामगार वारसांना नोकरी देण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गिरणी कामगार वारस संघर्ष समिती दिनांक २७ एप्रिल २०२३ रोजी स्व. आ. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे साखर कारखाना जि. सातारा येथे भव्य महामेळावा आयोजित केला आहे.
यासाठी जिल्ह्यातील सर्व गिरणी कामगार व कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन गिरणी कामगार/वारस एकजूट मुंबई, मिल कामगार एकता मंच, गिरणी कामगार तरुण स्वराज्य संस्था, मोरारजी मिल संघटना मार्फत करण्यात आले आहे…
प्रतिनिधी – सागर पिसाळ (7875411591)