पुणे:-प्रतिभावंत कवी म्हणून अनिलकुमार कदम यांचा सत्कार संपन्न.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
प्रतिभावंत कवी म्हणून अनिलकुमार कदम यांचा सत्कार संपन्न.
पुणे:-पुणे येथील वल्लरी मिडिया प्रस्तूत वल्लरी प्रकाशनाच्या वतीने कवी, लेखक, साहित्यिक, मुक्त पत्रकार, मराठी मासिक दमयंती चे कार्यकारी संपादक, दमयंती युट्यूब चॅनलचे मालक व संपादक श्री अनिलकुमार कदम यांच्या दहा कवितांचा समावेश असलेल्या कुमुदिनी प्रातिनिधिक काव्य संग्रह प्रकाशन कार्यक्रमात प्रतिभावंत कवी म्हणून श्री अनिलकुमार बुवासाहेब कदम यांचा सन्मान चिन्ह बुके कुमुदिनी काव्य संग्रह मराठी साहित्यातील सुप्रसिध्द गझलकार श्री म भा चव्हाण व संतसाहित्य अभ्यासक पत्रकार डॉ विद्याधर ताठे यांच्या शुभहस्ते देऊन यथोचित गौरव करुन सत्कार संपन्न झाला.
या प्रसंगी मराठी साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध कवयित्री समिक्षक श्रीमती दीपाली दातार म्हणाल्या की, अनिलकुमार कदम यांच्या कविता अंत प्रेरणेतून ,निर्मळ झरा वाहावा त्या प्रमाणे सहजपणे निर्माण झाल्या आहेत.मानवी भाव भावना व्यक्त करणारी कविता मनाला अंतर्मुख करते.ग्रामीण भागातील वास्तववादी चित्रण असलेल्या शेती ,शेतकरी, शेतमजूर, पशुपक्षी, निसर्ग, शेती,सामाजिक स्थिती,मानवी नातेसंबंध,या विविध उच्च कोटीची मानवी जीवनातील उच्च मानवतावादी मुल्यांची जोपासना करणाऱ्या कविता लेखन अनिलकुमार कदम यांनी केले आहे. असे विचार मराठी साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध कवयित्री समिक्षक श्रीमती दीपाली दातार यांनी व्यक्त केले.
यावेळी अनिलकुमार कदम यांनी गेल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पाऊस,आलेला महापुर, महापुरामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान या पार्श्वभूमीवर पाऊस या कवितेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अवस्था कविता वाचन करताना विशद केली.अनिलकुमार कदम यांची शैक्षणिक कृती संशोधन,विद्या मिळवू येथे व काव्यरंग हा कवितासंग्रह अशी तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.दैनिक शिवसंदेश तरुण भारत ऐक्य मुक्तागिरी ग्रामोध्दार ललकारी पुढारी लोकमत सकाळ, दमयंती अशा अनेक वृत्तपत्रांत,मासिके, साप्ताहिकं यामधून कथा कविता लेख स्तंभलेखन मधून सुमारे पाचशे पेक्षा जास्त लेखन प्रसिद्ध झाले आहे.
या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी मराठी साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध गझलकार श्री म. भा. चव्हाण होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचे गाढे अभ्यासक पत्रकार डॉ विद्याधर ताठे, मराठी साहित्य क्षेत्रातील कवयित्री, समिक्षक श्रीमती दीपाली दातार, शैक्षणिक क्षेत्रातील सौ सीमा कुलकर्णी,समर्थ फौंडेशनचे किरण इनामदार उपस्थित होते.
या वेळी प्रास्ताविक व्यंकटेश कल्याणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन संजीव कुलकर्णी यांनी केले सुत्रसंचलन प्रज्ञा कल्याणकर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी गडचिरोली येथील राणी बावनकुळे, मुंबई येथील शमिका आजगावकर, पुणे येथील स्वाती भोसले, मिनाक्षी शिलवंत, समिधा करमरकर इत्यादी साहित्य क्षेत्रातील कवी, साहित्यिक, लेखक उपस्थित होते.