
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
भिमशक्तीचे बाळासाहेब शिरसट….
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा जतन करून एक पिढी सामाजिक व धार्मिक कार्यात स्वतःला झोकून देत आहे. यामध्ये कराड तालुक्यातील इंदोली गावचे सुपुत्र तथा शिक्षण क्षेत्रामध्ये आणि राजकारणात आपला प्रभाव दाखवणारे भिमशक्तीचे राज्य सरचिटणीस बाळासाहेब केशव शिरसट यांचा आज रविवार दिनांक एक जून रोजी प्रथम पुण्यस्मरण दिन आहे. त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा भूमीमध्ये खऱ्या अर्थाने महात्मा फुले, शाहू महाराज व सावित्रीबाई फुले यांच्यासह अनेक मान्यवरांनी वैचारिक मशागत निर्माण करून ही सातारची भूमी सुजलम केलेले आहे. याच मातीतून उगवणाऱ्या धान्य- कडधान्य व फळ- फुले यांचा आस्वाद घेणारी पिढी खऱ्या अर्थाने स्वावलंबी, स्वाभिमानी व स्वकर्तबदारी दाखवणारी निर्माण झाली आहेत. आदरणीय बाळासाहेब शिरसट हे आपल्यातून शरीराने निघून गेले असले तरी त्यांच्या कार्याच्या आठवणीने आजही त्यांचे स्मरण केले जात आहे. बाळासाहेब शिरसट म्हणजे कोरेगाव शहरातील सरस्वती विद्यालय या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांना नैसर्गिक संधी प्राप्त झाली. खाजगी शिक्षण संस्थेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणूक लढवण्यास मुभा होती. हे ओळखून राष्ट्रीय काँग्रेसचे विचारवंत व निर्भीड नेते माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांनी इंदोली जिल्हा परिषद गटातून राष्ट्रीय काँग्रेसच्या हात चिन्हावरून त्यांना उमेदवारी देऊन विजयी केले. योगायोग म्हणजे त्यावेळेला काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आघाडी असल्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीमध्ये रिपब्लिकन पक्षाला सहभागी करून घ्यावे. असा आग्रह रिपब्लिकन नेते व तात्कालीन समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांचा होता. या आग्रहाला मान देऊन विलासराव पाटील उंडाळकर यांनी समाज कल्याण सभापती पदी बाळासाहेब शिरसाट यांची वर्णी लावली आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या सामाजिक व राजकीय क्षेत्राला पायाभरणी केली. सातारा जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील दलित कष्टकरी, शोषित, वंचित समाजापर्यंत समाज कल्याण सभापती म्हणून बाळासाहेब शिरसट पोहोचले. आपण समाजाचे देणे लागतोय. याची त्यांनी जाणीव ठेवली. अगदी उदाहरण द्यायचं झाले तर सायगाव ता. जावळी येथील बौद्ध वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी हातपंप उभारणीसाठी त्यांनी तातडीने सूचना केली आणि एका आठवड्यात बौद्ध वस्तीमध्ये हातपंप बसवण्यात आला. अशी शेकडो उदाहरणे आहेत की ज्या ठिकाणी बाळासाहेब शिरसट यांच्या समाज कल्याण सभापती काळामध्ये त्यांना काम करता आले. काही काळ ते पंचायत समितीच्या सभापती म्हणून सुद्धा आपल्या कामाची चुणूक दाखवत होते.
राजकीय पटलावर रिपब्लिकन पक्षातून पुढे मुंबईचे महापौर चंद्रकांत हंडोरे यांचे नेतृत्व निर्माण झाले आणि चेंबूर विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून विजय झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांचा सन्मान ठेवून त्यांना समाज कल्याण मंत्री केले. तेव्हापासून आदरणीय बाळासाहेब शिरसट हे भीमसैनिक म्हणून त्यांच्या पाठीशी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहिले. खूप मोठी मजल त्यांना मारायची होती परंतु व्यक्तिगत आजारपणामुळे अडचणी निर्माण झाल्यामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. याची सर्वच भीमसैनिकांना खंत आहे. आज भीमशक्तीच्या माध्यमातून वेळे कामथीचे अरुण पवार व माण तालुक्यातील रांजणीचे गुलाबराव बनसोडे व जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे, म्हसवे येथील अरुण माने, नागठाणे चे राजरत्न कांबळे यांच्या समवेत अनेकांनी बाळासाहेब शिरसट यांच्यासोबत आंबेडकरी चळवळीला ताकद देण्याचे काम केले. भीमशक्ती ही वैचारिक शक्ती आहे. शक्तीचे प्रदर्शन करण्यापूर्वी त्या शक्तीचे मौलिक विचार समाजामध्ये असलेले स्थान अधोरेखित करत असते. सोन्याला कितीही फडक्यात बांधले तरी ते सोनेच असते. या उलट बेन्टेक्सला चांगले पॅकिंग असले तरी ते बेन्टेक्स बाजारात फारशी किंमत मिळवून देत नाही. त्या अर्थाने आजही भीमशक्तीचे कार्यकर्ते हे सोन्यासारखे समाजामध्ये वावरत आहेत. राजकारणामध्ये काही आघाड्या- युती कराव्या लागतात. कारण, खऱ्याखुऱ्या सत्तेत सहभागी म्हणजे स्वबळावरची नारा देणे आणि पुन्हा कार्यकर्त्याचा उमेदवारी अर्ज माघारी घेणे म्हणजे सत्तेत सहभाग नसतो तर स्वाभिमानाने व समाजाच्या हितासाठी निर्णय घेणे म्हणजे नैतिकरित्या सत्तेत सहभागी होणे असा त्यांनी अर्थ काढला होता. आज भीमशक्ती चळवळ कासव गतीने का होईना पण सातारा जिल्ह्यात आपल्या अस्तित्व निर्माण करत आहे. भविष्यात भीमशक्तीचा हे वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. हीच खऱ्या अर्थाने आदरणीय बाळासाहेब शिरसट यांना श्रद्धांजली ठरेल. आज त्यांचे चिरंजीव अमित शिरसट हे सुद्धा वडिलांचा वारसा जपण जतन करत आहेत. त्यांना समाजाबद्दल आवड असणे म्हणजेच बाळासाहेब शिरसट विचाराच्या रूपाने कार्यरत आहेत. हे सुद्धा नमूद करावे वाटते.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
_____________________________
फोटो– बाळासाहेब शिरसट