पुसेसावळी:- वीज आली-आली, गेली गेली. वारंवार वीज खंडित होण्याच्या प्रकाराला कंटाळले नागरिक.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वीज आली-आली, गेली गेली.
वारंवार वीज खंडित होण्याच्या प्रकाराला कंटाळले नागरिक.
महावितरणाच्या ढिसाळ नियोजनामुळे पुसेसावळी ता.खटाव परिसरातील नागरिकांना वीज वारंवार खंडित होण्याच्या समस्येचा त्रास होत आहे. त्यामुळे महावितरण विभागाच्या विरोधात नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.कर्मचाऱ्यांमध्ये स्मार्टनेस पणाचा अभाव कि अजून काही?हा प्रश्न नागरिकांना पडताना दिसतो.त्यातच वीज वितरण विभागाच्या वतीने वीज वितरण सुरू असताना विजेचा लपंडाव कधी रात्री तर कधी दिवसा पहावयास मिळत आहे. त्यामुळे घरातील विजेवर चालणारी उपकरणे पूर्णतः ठप्प होत आहेत.महावितरणाच्या ढिसाळ नियोजनामुळे वारंवार वीज खंडित होण्याच्या प्रकाराला नागरिक वैतागले आहेत.बरेच ठिकाणी कुपनलिकेला पाणी आहे तर वीज नाही, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होत आहे.त्यातच पुसेसावळी सह ग्रामीण भागात लहान लहान उद्योग असणाऱ्या व्यावसायिक व दुकानदार यांना तर वीज गेली की अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्वांचा त्यांच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे.तर बऱ्याच व्यावसायिकांच्या मालाचे नुकसान होत आहे. या बऱ्याच अडचणी पाहता हा गंभीर मुद्दा असून देखील याकडे ग्रामीण भागातील स्थानिक नेत्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे,अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असणारा विजेचा लपंडाव तसेच व्यवसायिकांचे होणारे नुकसान त्यामुळे व्यवसायिकांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे.आधीच वीज बिलात भरमसाठ वाढ होऊन येत असल्यामुळे आणि ते कमी करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. ते पाहता केवळ वीज वसुली वर लक्ष केंद्रित केले जात आहे. त्याच पद्धतीने नागरिकांना देखील होणाऱ्या समस्या कशा सोडवता येतील हे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाहणे गरजेचे आहे.
चौकट,
सातत्याने होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे परिसरातील नागरिक वैतागलेले आहेत.कमी जास्त होणाऱ्या होल्टेजमुळे विद्युत उपकरणांचे नुकसान देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.ग्रामस्थांच्या घरातील होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसानीचे भरपाई महाराष्ट्र राज्य विद्युत महा परिवहन मंडळ करून देणार का? असाही प्रश्न ग्रामस्थांच्या मनात उपस्थित होत आहे.मान्सून पूर्व विद्युत कामे पूर्ण करून पावसाळ्यामध्ये विना व्यत्यय वीज पुरवठा करावा.तसेच योग्य त्या उपाययोजना होण्याची गरज आहे.