कोरेगाव:-अवकाळी मेघा पेक्षाही महामार्गावरील मेगा इंजिनिअरिंगचा भोगावा लागे त्रास.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
अवकाळी मेघा पेक्षाही महामार्गावरील मेगा इंजिनिअरिंगचा भोगावा लागे त्रास.
कोरेगाव दि: महामार्ग विस्तारीकरणाच्या नावाने सध्या सातारा जिल्ह्यात मोठे संकट निर्माण झाले आहे. अवकाळी मेघा पेक्षाही मेगा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुरस्कृत सातारा- पंढरपूर महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कामाने वाहन चालकांना त्रास भोगाव लागत आहे. याबाबत पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राज्य उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे यांच्यासह आता साताऱ्यातील वाहन चालक सुद्धा पेटून उठलेले आहेत. याबाबत भविष्यात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने टक्केवारी घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी माणुसकी दाखवावी. न्यायालयातूनच निर्णय घ्यावा लागेल. असा इशारा वाहन चालक देऊ लागलेले आहेत.
मेगा इंजीनियरिंग प्रा .लि .क .यांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सातारा- कोरेगाव रस्त्यावरील माहुली ते खवली येथे गडूळ पाण्याचे तळे(स्विमिंग पूल) झाले आहे . खड्ड्यातून वाहन चालवताना अपघात होत आहेत. स्थानिकांना अपघात झाल्यानंतर मदतीसाठी धावपळ करावी लागत आहे. असं स्थानिक रहिवाशांनी सांगितले. परंतु महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ व संबंधित विभागाला याचे काही सोयर सुतक नाही. हे सिद्ध करायचे आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कोणतेही कामाची पाहणी व अहवाल सादर केल्यानंतर काम पूर्णत्वाचा दाखला दिला जातो. या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम व अपुरे काम असून सुद्धा पूर्णत्वाचा दाखला दिल्यास न्यायालयात धाव घ्यावी लागेल असा इशारा देण्यात आलेला आहे.
स्थानिक प्रसारमाध्यम स्थानिकांच्या प्रश्नाबाबत सातारा जिल्हा प्रशासनापर्यंत आवाज उठवत आहे. हाच मोठा दिलासा आहे. तर काहींना आंतरराष्ट्रीय प्रश्न महत्त्वाचे म्हणून नाईलाज असतो याच महामार्गावरून आदळ आपट वाहनांची होत आहे. तरीही सातारा – माण तालुक्यात मार्गक्रमण करावी लागते. त्यांना पुणे मुंबईतील आक्काचा हुकूम नसल्यामुळे ते मेघा कंपनीच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत काही करू शकत नाहीत. हे सुद्धा उघड झाले आहे. बिचाऱ्यांना उघड्या डोळ्यांनी अन्याय बघावं लागत आहे. यामध्ये त्यांचा दोष नाही. का निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. हे त्यांनी मान्य केले आहे.
सातारा- पंढरपूर महामार्ग म्हणजे वारकऱ्यांसाठी काशी मथुरा आहे. किमान आषाढी वारी निघण्याच्या पूर्वी तरी रस्त्याची दुरुस्ती व्हावी. ही मापक अपेक्षा वारकऱ्यांनी केलेली आहे. महामार्गावर खड्डे पडल्यामुळे साथीचे रोग पसरून त्याचा स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे. माहूली रेल्वे स्टेशन व खावली परिसरात अनेक जण आजारी पडले असून त्याचे प्रमाण वाढले आहे. निविदा मध्ये जाहीर केल्यास प्रमाणे झाडे लावली नाही . त्यापूर्वी मेगा इंजिनिअरिंग कंपनीला येथील काम सोडून दुसरीकडे हात मारायचा आहे. या रस्त्यावर अपघात घडू नये म्हणून त्यांनी त्वरित उपाययोजना कराव्यात. ही नम्र विनंती अन्यथा आता आत्मदहनाशिवाय पर्याय नाही. असे स्थानिक आणि नमूद केले आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांना आंदोलन करावे लागते एवढं मेगा इंजिनिअरिंग कंपनीची ताकद वाढली आहे. हे निर्विवाद सत्य आहे.आता यामुळे न्यायालयाशिवाय पर्याय राहिला नसल्याची मत सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, याबाबत मेगा इंजीनियरिंग आपली भूमिका मांडण्यास पुढे येऊ शकली नाही. हे सुद्धा सिद्ध झाले आहे.