दहिवडी:-दुष्काळी माण खटाव मध्ये टँकरचे पाणी भरताना डोळ्यातही दिसते पाणी…..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
दुष्काळी माण खटाव मध्ये टँकरचे पाणी भरताना डोळ्यातही दिसते पाणी…..
दहिवडी दि: सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भाग असलेल्या दुष्काळी माण – खटाव मध्ये ३९ गावे ३५७ वाड्यांना ४९ खाजगी पिण्याच्या पाण्याच्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.१४ खाजगी विहिरी व सहा हातपंप शासनाने आदी ग्रहण केले आहेत. पिण्यासाठी टँकरद्वारे आलेले पाणी भरताना दुष्काळग्रस्तांच्या डोळ्यातील पाणी पाहून अनेकांचे हृदय गहिवरले आहे. समाज माध्यमावर त्याचे विदारक चित्र दुष्काळग्रस्तांच्या व्यथा बोलक्या करत आहेत.
शासकीय माहितीनुसार सातारा जिल्हाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने पाणीटंचाई कक्षाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना तातडीने पाणीपुरवठा केला जात आहे. भविष्यात टँकर फेऱ्या वाढण्याची शक्यता आहे.
सध्या दहिवडी व शिंगणापूर भागातील बिजवडी, पांगरी, येळेवाडी, पाचवड, राजवडी ,जाधववाडी, वडगाव, मोगराळे, तोंडले आणि मोही , डंगिरेवाडी , थदाळे , वावरहिरे , अनभुलेवाडी, दानवलेवाडी
सोकासन , शेवरी,धुळदेव , वरकुटे, म्हसवड, कारखेल , हवालदारवाडी, भाटकी, संभुखेड , खडकी, रांजणी,
जाशी, पळशी, पिंगळी बु,
मार्डी, खुटबाव , पर्यंती, इंजबाव भालवडी,पानवण, विरळी,वारुगड , कुळकजाई, शिरवली, सत्रेवाडी,
टाकेवाडी, उकिर्डे, कोळेवाडी, परकंदी, शिंदी बु , महिमानगड, सुरुपखानवाडी, पांढरवाडी,कुकुडवाड, दोरगेवाडी ,बुध,
औंध,का. खटाव,मायणी,निमसोड
मांजरवाडी, नवलेवाडी, मोळ,जायगाव करांडेवाडी,एनकुळ, डांभेवाडी, तडवळे
दातेवाडी, अनफळे, खातवळ, धोंडेवाडी
कामथी,पुसेगाव, कटगुण, उंबरमळे, कातळगेवाडी,कलेढोण, कान्हरवाडी
खटाव, जाखणगाव या ठिकाणी व परिसरात शासनाने टँकरने पाणीपुरवठा केल्यामुळे अनेकांची तहान भागत आहे.
दुष्काळ नाहीसा व्हावा. अशी सर्वांचे प्रामाणिकपणे इच्छा आहे. त्या दृष्टीने मार्गक्रमण होत असताना काही जण इव्हेंट म्हणून त्याच्याकडे पाहत आहे. मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्याचे चित्रीकरण ही स्थानिकांच्या बाबत दिशाभूल केली जात आहे की काय? अशी शंका उपस्थित होत आहे. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणारे विरोधक संपले असल्याने विरोधकांचाही दुष्काळ दिसून येत आहे.
माण खटावच्या दुष्काळाबाबत मोठ्या प्रमाणात पाणी जिरवा.. पाणी मिळवा.. याचा आरंभ दिवंगत माजी आमदार धोंडीराम वाघमारे आणि महाविकास आघाडीच्या कारकिर्दीमध्ये झालेला होता. यामध्ये तात्कालीन आमदार म्हणून जयकुमार गोरे यांचाही सिंहाचा वाटा आहे. त्याचे स्मरण अनेकांना आहे. परंतु, सध्या इव्हेंट करून पाणी आल्याचे दाखवून दिले जात असले तरी दुष्काळग्रस्तांच्या डोळ्यातील पाणी बघून अनेकांना मानवता भावनेतून त्या प्रसंगाकडे पाहण्याची गरज निर्माण झालेली आहे.
दुष्काळी भागातील वाड्या वस्तीतील टँकरची वाट पाहणारे डोळे दिसत नसले तरी राजकीय नेत्यांनी ओंजळीमध्ये घेतलेले पाणी सातत्याने काही प्रसार माध्यम दाखवून देत आहे. तर दुसऱ्या बाजूला टँकरची वाट पाहणारे डोळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे मात्र त्याला काही प्रसार माध्यम व कॅमेरा मध्ये जागा उरली नसल्याची खंत दुष्काळग्रस्त व्यक्त करत आहेत. दरम्यान , आंधळी धरणातून रानंद तलावापर्यंत २२ किलोमीटरच पाईपलाईन टाकून
३२ गावच्या दुष्काळ ग्रस्तांना पाण्याची व्यवस्था करण्यात आली. त्याच्या जलपूजन सोहळा मात्र देखण्या पद्धतीने करण्यात आला. त्याची समाधान राजकीय नेत्यांना आजही प्रोत्साहित करत आहेत.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
______________________________
फोटो– दुष्काळी माण– खटाव तालुक्यात टँकरच्या पाण्यासाठी स्थानिकांची झालेली गर्दी… (छाया– अजित जगताप दहिवडी)