सातारा:-सामाजिक प्रगतीसाठी, कर्मवीरांचे योगदान अद्वितीय – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सामाजिक प्रगतीसाठी, कर्मवीरांचे योगदान अद्वितीय – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन.
सातारा दि: : शिक्षणाशिवाय आपल्या प्रदेशाचा विकास होणार नाही. म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागात शिक्षण संस्था उभारल्या . वारसा तयार केला .तो येणाऱ्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहे. सामाजिक उत्थानासाठी शिक्षणासाठी त्यांनी दिलेले योगदान अद्वितीय आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलपती मा.सी.पी.राधाकृष्णन यांनी व्यक्त केले.
ते सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्रांगणात आयोजित केलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या प्रथम दीक्षांत समारंभ कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.या समारंभास राज्यपालांचे प्रधान सचिव प्रशांत नारनवरे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलाधिकारी चंद्रकात दळवी,कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के.विकास देशमुख,डॉ. माणिकराव साळुंखे ,विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय कुंभार,डॉ.हेमंत उमाप, जे.के.जाधव, डॉ.शिवलिंग मेंनकुदळे, प्रा,डॉ.डी.नामदास,डॉ.अनिलकुमार वावरे, डॉ. महांनवर,प्रा.आरआर.साळुंखे,,प्रा.डॉ.सचीन वर्णेकर,प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे, प्राचार्य डॉ.बी.टी.जाधव,प्राचार्य डॉ.गणेश जाधव, जिल्हाधिकारी संतोष पाटील , पोलीस अधीक्षक समीर शेख ,मुख्य कार्यकारी अधिकारी यशानीनागराजन व इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सातारा हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिसरी राजधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म जर या महाराष्ट्र भूमीत झाला नसता तर काय झाले असते ? मी सुद्धा, आज मी इथे सी.राधाकृष्णन नावाने उभा आहे पण माझे सुद्धा नाव अजून काहीतरी राहिले असते. या भारत भूमीत अनेक पाकिस्तान तयार झाले असते आक्रमकांच्या विरोधात हे शूर योद्धे लढले. आपण इस्लामच्या विरोधात आहोत का ? नाही. इस्लाम सर्वत्र आहे.आपल्याला एकत्र मिळून राहायचे आहे. असे स्पष्ट करून आदरणीय राज्यपाल पुढे म्हणाले, सातारा ही राजर्षी छत्रपती शाहू महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील इत्यादी अनेकांची भूमी आहे. १९५२ ला ऑलिम्पिक मध्ये कुस्तीत मेडल मिळवणारया खाशाबा जाधव यांनी १९५२ ऑलम्पिक स्पर्धेत मिळविलेले मेडल हे महाराष्ट्र प्रदेशाचे राष्ट्राला मोठे योगदान आहे.
२०२१ साली स्थापन झालेले कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे एक तरूण विद्यापीठ आहे. हा परिसर आपण असाच स्वच्छ ठेवा . भविष्यात भारतभूमी स्वच्छ ,सुंदर आणि हिरवीगार करा. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या तीन नामांकित घटक महाविद्यालयातून सात हजार विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. अधिकाधिक ज्ञान आणि गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमल बजावणी करण्यात हे विद्यापीठ अग्रणी आहे.
कर्मवीर भाऊराव पाटलांचा शैक्षणिक वारसा हा सामाजिक न्याय ,समता व शिक्षणाचा आहे. या समारंभात ३४ सर्वोकृष्ट गुण मिळविलेल्या विविध विद्या शाखा व विषयाच्या विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.डॉ. सविता मेनकुदळे यांनी मराठीत तर प्रा.राजेंद्र तांबिले यांनी इंग्रजीत केले.या समारंभास विद्यापीठाचे अधिकारी ,प्राध्यापक ,विद्यार्थी ,कर्मचारी व पोलीस अधिकारी तसेच मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
———————————————–
फोटो कॅप्शन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ निमित्त राज्यपाल व मान्यवर (छाया जीअजित जगताप, सातारा)