खटाव:-रिपब्लिकन पक्षासाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा वडूज नगरीत सत्कार.
प्रतिनिधी अजित जगताप सातारा:-9922241299

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी अजित जगताप सातारा
रिपब्लिकन पक्षासाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा वडूज नगरीत सत्कार.
(अजित जगताप)
वडूज दि: छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेचे विचार प्रभावीपणे मांडण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाचे विचार मांडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वडूज ता. खटाव या ठिकाणी जाहीर सत्कार करण्यात आला.
सध्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जल्लोष सुरू होणार आहे .अशा वेळेला दिन, दलित, कष्टकरी, पददलित व महिलांचा सन्मान राखण्यासाठी व प्रत्येक घरात ज्ञानाची गंगा पोहोचवण्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित केलेला आहे. रिपब्लिकन पक्षाचे( निकाळजे गट )खटाव तालुका अध्यक्ष युवा नेते सागर भिलारे, शैलेश बाबा जाधव यांच्या प्रयत्नातून संपूर्ण वडूज नगरी जयंतीमय करण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने आज वडूज नगरीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहीर मेळावा व नागरी सत्काराचे कार्यक्रम आयोजित केले होता. याला उदंड प्रतिसाद लाभला.
महाराष्ट्राच्या राजकारणात अल्प अवधी मध्ये दीपक भाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाने चांगल्या पद्धतीने कामकाजाला गती दिलेले आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष झपाट्याने वाढत आहे. आज पक्षाच्या पद नियुक्ती नंतर मार्गदर्शन करताना दादासाहेब ओव्हाळ यांनी सांगितले, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी रिपब्लिकन पक्ष ताकदीने उतरलेला आहे.
आपल्या सर्व जाती-धर्मातील बांधवांचे रक्षण करण्याची जबाबदारी फक्त रिपब्लिकन पक्ष निकाळजे गट स्वीकारत आहे. त्यामुळे या पक्षात येणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी सागर फाळके, सोमनाथ धोत्रे, विनोद भिसे, विनोद जाधव, विशाल भोसले ,सनी कमाने, सन्नी खरात हेमंत गोडसे, नितीन बोतलजी तसेच महिला वर्गाच्या उपस्थितीत मेळावा यशस्वीरीत्या झाल्याबद्दल अनेक कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.
खटाव तालुक्यातील वडूज नगरी ही शहीद व वीरांची व हुतात्म्यांची भूमी असलेले या भूमीतून क्रांतीचे बीज रोवले गेलेले आहे. त्यामुळे क्रांतिकारी विचाराला अभिवादन करून येथील भीमसैनिक पेटून उठलेला आहे. आज सागर भिलारे सारख्या युवा नेत्याची साथ लाभल्यामुळे खटाव तालुक्यामध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. शासकीय योजनेचा लाभ खटाव तालुक्यातील सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी रिपब्लिकन पक्ष हा खऱ्या अर्थाने दूत ठरणार आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांनी कोणतेही आमिषाला बळी न पडता आपले सर्व सामान्य प्रश्न सोडवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला साथ द्यावी. त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीला रिपब्लिकन पक्ष उभा राहील. अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
या कार्यक्रमाला पुसेगाव पुसेसावळी वडूज खातवळ निमसोड गोपूज, कुमठे, यलमरवाडी, वर्धन गड, येरळ वाडी, कूरोली, तसेच गुरसाळे, विखळे, चितळी, डिस्कळ मोळ , निढळ विसापूर आधी गावातील रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा शुभारंभ झाल्याचे सर्वत्र चित्र दिसून आले.
———————————————————–
फोटो –
रिपब्लिकन पक्षाच्या वतीने वडूज ता. खटाव येथे रिपब्लिकन नेते दादासाहेब ओव्हाळ यांच्या हस्ते सत्कार करताना सागर भिलारे , शैलेंद्र जाधव व मान्यवर कार्यकर्ते (छाया – अजित जगताप)