श्रीरामपूर:-मुख्यमंत्री शिदेंनी सुतार समाजाला दिला न्याय ! इंजि.पराग अहिरेंनी समाजाच्या वतीने मानले आभार.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
मुख्यमंत्री शिदेंनी सुतार समाजाला दिला न्याय !
इंजि.पराग अहिरेंनी समाजाच्या वतीने मानले आभार.
श्रीरामपूर (Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुतार समाजासाठी आर्थिक महामंडळ मंजुर करून खऱ्या अर्थाने समाजाला न्याय दिला. याबदल मुख्यमंत्री तसेच पाठपुरावा करणाऱ्या नेत्यांचे अखिल विश्वकर्मीय समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि . पराग अहिरे यांनी समाजाच्या वतीने जाहीर आभार मानले आहेत याबाबत इंजि पराग अहिरे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की गेल्या ७५ वर्षात सुतार समाजाला कोणत्याही सरकारने न्याय दिला नाही मात्र शिंदे गटाचे मा आमदार संजय रायमुलकर . मेहकर यांच्या पाठपुराव्यामुळे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुतार समाजाला आर्थिक महामंडळाच्या स्वरूपात न्याय दिला . सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सुतार समाजासाठी आर्थिक महामंडळ मंजून केले त्यासाठी महाराष्ट्रातुन सुतार समाज बांधवांचे प्रयत्न व विशेष अखिल विश्वकर्मीय समाज संघ महाराष्ट्र राज्य व अन्य समाजातील विविध घटकांनी प्रयत्न केले तसेच सुतार समाजाला न्याय मिळावा . यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस . उपमुख्यमंत्री अजित पवार . माजी मंत्री आमदार जयकुमार रावल . धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन . नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे व समस्त समाजबांधव व भगिनींनी प्रयत्न केले . याबदल सर्वांचे समाजाच्या वतीने जाहीर आभार मानतो . असेही इंजि पराग अहिरे यांनी शेवटी म्हटले आहे.