सातारा:-सातारा जिल्ह्यातील १७ प्रकल्प धरणग्रस्तांचे पुनर्वसन गतीने….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सातारा जिल्ह्यातील १७ प्रकल्प धरणग्रस्तांचे पुनर्वसन गतीने….
सातारा दि: सातारा जिल्ह्यातील विविध १७ प्रकल्पासाठी अनेकांनी आपली गाव जमिनी यांचा त्याग केला आहे. अखेरचा हा तुला दंडवत म्हणत दोन पिढ्या गाव सोडून गेले आहेत. धरणग्रस्त नेत्यांच्या संघर्षानंतर पुनर्वसनाच्या नियम आणि अटी लागू असल्यामुळे अनेकांना योग्य पुनर्वसन व्हावे. यासाठी सातारा जिल्ह्यामध्ये गती आलेली आहे. सुदैवाने सातारचे सुपुत्र नामदार मकरंद पाटील यांच्याकडे पुनर्वसन व मुदत खाते आल्यापासून खऱ्या अर्थाने प्रशासकीय कारभारात मध्ये चांगलीच सुधारणा झाली आहे. असे पुनर्वसन विभागातील अधिकारी वर्ग सांगतात तर दुसऱ्या बाजूला आजही धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त यांच्या पुनर्वसनाचा शंभर टक्के प्रश्न सुटू शकलेला नाही. हे नाकारून चालणार नाही. अशी ही स्थिती ऐकण्यास मिळत आहे.
सध्या सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुनर्वसन तथा उपजिल्हाधिकारी श्री मनोहर गव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली धोम ,नागेवाडी, येरळवाडी निरा देवधर, आंधळी, महू हातगेघर, धोम बलकवडी, आसरे ,रेनावळे बोगदा प्रकल्प, उत्तर मांड, मोरणा गुरेघर, महिंद, तारळी, वांग, मराठवाडी या प्रकल्पाच्या पुनर्वसनाचे काम सुरू आहे. उपजिल्हाधिकारी पुनर्वसन श्री मनोहर गव्हाड व भूसंपादन क्रमांक १६ उपजिल्हाधिकारी तसेच सातारा, वाई, पाटण, कराड उपविभागीय अधिकारी याकडे लक्ष देत आहेत.
सातारा जिल्ह्यातील सतरा प्रकल्पाचे सात लाख ७८ हजार८९४ प्रकल्पग्रस्त आहेत त्यापैकी कोयना ९७६ नागेवाडी १३१ मोरणा गुरेघर २४३ महिंद ३४ उरमोडी३६८ , तारळी ६३वांग मराठवाडी ४५ आंधळी३९ व उत्तर मांड ३१४ धोम बलकवडी १७७ आसरे रे नावळे बोगदा प्रकल्प ७४ असे मिळून २७०५ अपात्र प्रकल्पग्रस्तांची संख्या आहे.
. कण्हेर व धोम प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करणे कामी उजनी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील सोलापूर जिल्ह्यात उपलब्ध जमीन दिलेली आहे . कोयना धरणग्रस्तांचे जमीन वाटपाबाबत संकलन सुरू आहे. त्यामुळे अद्यापही माहिती मिळू शकलेली नाही. नागेवाडी, मोरणा गुरेघर,महिंद, आंधळी येथील प्रकल्पग्रस्तांनी ६५ टक्के रक्कम भरलेली नाही तर उरमोडी ६५ टक्के रक्कम न भरल्याने३०२ खातेदार व इच्छुक २६६ खातेदारांना अद्यापही निर्णय होऊ शकले नाही. उत्तर मांड येथील ४२ प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप झाली आहे तर धोम बलकवडी अपात्र प्रक्रिया यांच्या निर्वाह क्षेत्र हे सोळा एकर पेक्षा जास्त असलेले तसेच ६५ टक्के रक्कम भरली नाही. धोम बलकवडी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना फलटण तालुक्यातील बारा गावे व खंडाळा तालुक्यातील पाच गावे नियोजन आराखड्यानुसार वाटपासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. अशी माहिती सातारा जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड यांनी दिलेली आहे.
सातारा जिल्ह्यातील १७ प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करण्यात आले असून त्यांची संख्या १८,७७० एवढी आहे.तीन प्रकल्प वगळता अपात्र प्रकल्पग्रस्तांची संख्या २७०५ एवढी आहे. दरम्यान, जावळी तालुक्यातील मुनावळे प्रकल्पग्रस्तांच्या समस्या दूर करण्यासाठी महाराष्ट्राचे तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व सातारा जिल्ह्यातील खासदार- आमदार यांनी प्रयत्न केले. मात्र अधिकारी वर्गाकडून याबाबत सकारात्मक अहवाल सादर न केल्याची चर्चा धरणग्रस्तांसाठी शिमगा ठरली आहे. त्यामुळे मुनावळे जलप्रकल्पाला तीव्र विरोध होत असल्याची भावना निर्माण झालेली आहे.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
_________________________________________________
फोटो – सातारा जिल्हा पुनर्वसन कार्यालय सातारा