कोरेगाव:- गाडगे महाराज आश्रमशाळाश्री ब्रह्मपुरी येथे कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीचे औचित्य साधून व्याख्यानमालेच्या निमित्ताने साहित्यीक आपल्या भेटीला उपक्रम…
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष:-7057706113

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
गाडगे महाराज आश्रमशाळाश्री ब्रह्मपुरी येथे कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीचे औचित्य साधून व्याख्यानमालेच्या निमित्ताने साहित्यीक आपल्या भेटीला उपक्रम…
मा. प्रा. युवराज खरात सर यांच्याशी विद्यार्थी आणि शिक्षकांनी साधला संवाद.
आज आमच्या आश्रमशाळेत शालेय गणेशोत्सव आणि कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. समाजातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे विद्यार्थांना मार्गदर्शन मिळावे यासाठी दर महिन्याला श्री गाडगे महाराज व्याख्यानमाला आयोजीत करण्यात येते. आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त साहित्यिक आपल्या भेटीला उपक्रमातून प्रसिध्द लेखक, कवी आणि सरदार बाबासाहेब माने महाविद्यालय, रहिमतपूर येथील प्रा. युवराज खरात सर यांच्याशी विद्यार्थी आणि शिक्षकांनी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ.भारती मोहिते मॅडम होत्या.
मान्यवरांच्या शुभहस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कलामंचातील विद्यार्थीनींनी सादर केलेल्या संदेशगीताने सर्वांना मंत्रमुग्ध केले.
प्रा. युवराज खरात सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कर्मवीर भाऊराव पाटील आणि निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या कार्याविषयी माहिती सांगून कर्मवीर अण्णा यांच्यामुळे आज बहुजन समाजातील प्रत्येक घरापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचली असून गाडगे बाबांनी सुद्धा गोरगरिबांचे अश्रू पुसून त्यांना अंधश्रद्धेपासून दूर करण्याचे पवित्र कार्य केले.
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी साहित्यीक युवराज खरात सर यांच्याशी संवाद साधताना अनेक प्रश्न विचारले आणि सरांनीसुद्धा विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांना अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्तरे दिली. विद्यार्थ्यांनी लेखक होण्यासाठी काय करावे?, समाज आणि साहित्यिक यांचा एकमेकांशी असणारा परस्पर संबंध याविषयी प्रश्न विचारले.
प्रा. युवराज खरात सर यांनी आश्रमशाळेतील ग्रंथालयाला त्यांनी स्वलिखित पुस्तकसंच भेट दिला.
माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ. भारती मोहिते मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जे जे न देखे रवी ते ते देखे कवी यानुसार कवी, लेखक, साहित्यीक हे व्यक्तीबरोबरच समाज मनापर्यंत पोहचत असतात असे सांगितले.
उपशिक्षक श्री. महेशकुमार बोभाटे यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमासाठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.दीपक माने सर, सर्व शिक्षक, अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रमेश घोलप सर यांनी केले आणि आभार श्री. रविंद्रनाथ मोहिते सर यांनी मानले.