ताज्या घडामोडी

तापोळा:-दुर्गम तापोळा भागातील निकृष्ट दर्जाच्या कामाचे आंदोलकांनी केले पोल खोल.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

दुर्गम तापोळा भागातील निकृष्ट दर्जाच्या कामाचे आंदोलकांनी केले पोल खोल.

तापोळा दि: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सातारा जिल्ह्याला महायुतीच्या माध्यमातून चार कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याचा आनंद अजूनही ओसंडून वाहत आहे तर दुसऱ्या बाजूला निकृष्ट दर्जाच्या कामाचा पंचनामा होत असून आज महाबळेश्वर तालुक्यातील रेणुशी- खरोशी निकृष्ट दर्जा रस्त्यांच्या आंदोलनानंतर आज आंदोलन व अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी रस्त्यावर गवत व मोरीला पाणी नाही. अशी अवस्था पाहण्यास मिळाली. या पोलखोल मुळे अधिकारी चक्राहन गेले.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समन्वय समितीचे महाबळेश्वर तालुकाध्यक्ष धोंडीबा धनवडे यांच्या नेतृत्वाखाली या भागातील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ यांनी अमर उपोषण सुरू केले होते. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अभय देत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी. अशी मागणी केल्यानंतर स्वतः जिल्हा अधिकारी संतोष पाटील यांनी याबाबत पाठपुरावा करून संबंधित रस्त्याची पाहणी करण्याचे आदेश दिले होते.
गुरुवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी भर उन्हात या रस्त्याची आंदोलक व ग्रामस्थ तसेच अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या निकृष्ट दर्जाचे काम पुन्हा कुदळीने खणून दाखवण्यात आले. या ठिकाणी बांधण्यात आलेल्या मोरीला पाणी न मारल्यामुळे हे उध्वस्त होत आहे. लोकप्रतिनिधी या भागांमध्ये विकास कामे आणण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. परंतु याच ठिकाणी काही ठेकेदार कामे घेऊन सब ठेकेदार नेमतात. सब ठेकेदार स्थानिक भूमिपुत्र असल्यामुळे स्थानिकांना फारसे बोलता येत नाही. त्यामुळे शासनाच्या निधीची लूट होत आहे.
तीन मीटर रस्त्याचे काम दोन मीटर केले जाते. त्यामध्ये भरावाची गॅरंटी नाही. मजबुतीकरण झालेले नाही. खडी किती इंची? ठेकेदारला सांगता येत नाही. आजही या भागात ही वीस वर्षापासून बांधण्यात आलेली मातीची जुनी घरे भक्कम आहेत. पण, दोन वर्षात बांधलेले रस्ते उध्वस्त होत आहे. ही बाब आता येथील स्थानिक भूमिपुत्रांनीच उघड करून दाखवली आहे.
सब ठेकेदार सांगतील तेवढेच काम लेबर करीत असतात. त्यामुळे लक्ष वेधून घेण्यासाठी स्थानिकांनी आवाज उठवला. या निकृष्ट दर्जाचे काम म्हणजे हे फक्त तापोळा भागातील कोयना जलाशयातील थोडसं जल आहे बाकी मात्र जेवढं उकरून काढाल तेवढा भ्रष्टाचार बाहेर पडेल. अशी परिस्थिती झालेली आहे.
याबाबत स्थानिकांनीच आवाज उठवल्यामुळे खऱ्या अर्थाने या भागांमध्ये जनजागृती झालेले आहे. माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दरे तांब गावचे असल्यामुळे या भागात आता प्रशासकीय अधिकारी लक्ष देत आहेत. परंतु ठेकेदार व सब ठेकेदारांना त्याचे काहीच सोयरसुतक नसल्यामुळे स्थानिकांना आवाज उठवावा लागत आहे. या निकृष्ट दर्जाचे काम पुन्हा व्यवस्थित करावे .अशी मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केलेले आहे. गुणवत्ता नियंत्रक व त्यावर देखभाल करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना अभय दिले. आता त्यांच्यावरच या निकृष्ट दर्जाचे काम उत्कृष्ट करण्याची जबाबदारी आल्यामुळे दूध का दूध और पाणी का पाणी करण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान सातारा जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनाची पालन केल्याबद्दल आंदोलकांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.


RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

फोटो -तापोळा भागातील खरोशी रस्त्याची पाहणी करताना आंदोलक व अधिकारी (छाया- अजित जगताप, तापोळा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button