आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा जिल्ह्याच्या तापमानामध्ये वाढ पारा 40°c च्या वरती.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष
RPS STAR NEWS
सातारा जिल्ह्याच्या तापमानामध्ये वाढ पारा 40°c च्या वरती.
सातारा:- उष्णतेची लाट असल्यामुळे तापमानात खूप वाढ झाली असून पारा 40 च्या वरती गेला आहे. तरी लोकांनी काळजी घ्यावी. सकाळची कामे सकाळी 7 ते 11 व दुपारी 4.00 नंतर करावीत असे डॉक्टर सांगत आहेत.
*उष्माघात लक्षणे :-* ताप, लघवीला जळजळ, उष्णता वाढणे, थकवा, ग्लानी, उत्साह कमी होणे, नाकातून रक्त येणे, छातीत जळजळ, जुलाब-हगवण इत्यादी.
*उपाय*:-
रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत, वातानुकुलित खोलीत ठेवावे
रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत
रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी
रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, तसेच फळांमध्ये टरबूज, खरबूज, संत्रे, मोसंबी, डाळिंब, आंबा खाणे लाभदायक ठरते. कोकम, लिंबू आदींचे सरबत, नारळ पाणी, ताक, पुदिना सरबत याचे सेवन करावे.