साताऱ्यात शिवद्रोही कुलकर्णी व अफजल खान वध दिन कार्यक्रमाची तयारी सुरू ….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
साताऱ्यात शिवद्रोही कुलकर्णी व अफजल खान वध दिन कार्यक्रमाची तयारी सुरू ….
सातारा दि: शिवद्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णी व अफजल खान वध इतिहास तरुण पिढीला माहीत व्हावा. यासाठी भारतीय रक्षक आघाडीच्या वतीने साताऱ्यात रविवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता प्रतापगड या ठिकाणी हा वध दिन साजरा होत आहे. याची जय्यत तयारी सुरू झालेली आहे.
भारतीय रक्षक आघाडीने घेतलेल्या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांना निमंत्रित केलेले आहे. अर्धसत्य इतिहास आता पूर्ण सत्य करण्याचा हा खटाटोप भारतीय रक्षक आघाडी करत असल्याने त्याचे बहुजनांनी कौतुक केले आहे.
दिनांक १० नोव्हेंबर १६५९ रोजी अफजल खान यांनी पश्चिम महाराष्ट्रवर स्वारी केली होती. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना कैद करणे किंवा ठार मारणे असा त्याचा उद्देश होता. परंतु, स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना बहुजनांचे आशीर्वाद पाठीशी होते. त्यामुळे शिवाजी महाराजांवरील संकट दूर झाले .छत्रपती शिवराय प्रतापगडावर बेसावध असतानाच शिवद्रोही सरदार अफजलखानाचे वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी यांनी छत्रपतींच्या डोक्यावर तलवारीने वार केला. त्याच वेळेला हा वार चुकून छत्रपती शिवरायांनी क्षणाचाही विलंब न लावता कृष्णा भास्कर कुलकर्णी यांना यमसदनी पाठवले. जातीपातीच्या पलीकडे जाऊन स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले कार्य कधी विसरता येणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला नाण्याच्या दोन बाजू आहेत.. त्याप्रमाणे प्रतापगडावर घडलेल्या घटनेची एकच बाजू सातत्याने युवा पिढीसमोर आणली जात आहे. परंतु, तेवढीच सत्य असलेली दुसरी बाजू इतिहास तज्ञ ही खरा इतिहास जाणीवपूर्वक तरुण पिढीच्या समोर मांडत नाहीत. त्यामुळेच भारतीय रक्षक आघाडीच्या वतीने साताऱ्यातील प्रतापगडावर दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी भारतीय रक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक गायकवाड, सरचिटणीस अमर गायकवाड यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम होत आहे .
या कार्यक्रमासाठी उद्घाघाटक म्हणून संसद सदस्य खा. डॉ. अमोल कोल्हे, प्रबुद्ध रंगभूमी संशोधक दिग्दर्शक भूमिपुत्र टेक्सास गायकवाड, लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक शंकर भाऊ तडाखे, ऍड . अनंतराव दारवटकर भारतीय रक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष वैभव शिंदे, राष्ट्रीय काँग्रेस प्रवक्ता अरबाज शेख यांच्यासह अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे . या ऐतिहासिक आठवण जतन करण्यासाठी या कार्यक्रमाला शिवश्री क्रांती युद्ध पुरस्कार वितरण होणार आहे . यासाठी पटकथा संवाद लेखक प्रताप गंगावणे, शंकर भाऊ तडाखे ,अनिस मेमन यांनाही भारतीय रक्षक आघाडीचे वतीने पुरस्कार देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्यातील सामाजिक राजकीय शैक्षणिक व परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या उपस्थिती प्रार्थनीय आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण जय्यत तयारी झाली असून छत्रपती शिवरायांच्या शौर्याची गाथा व पोवाडा यावेळी सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची उत्सुकता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला लागलेले असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व बहुजनवादी व परिवर्तनवादी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. अशी माहिती भारतीय रक्षक आघाडीचे सरचिटणीस अमर गायकवाड यांनी दिली आहे.