ताज्या घडामोडी

सातारा:-कन्या शाळेतील अक्षदासाठी विद्यार्थ्यांनी काढला कॅन्डल मार्च..

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

कन्या शाळेतील अक्षदासाठी विद्यार्थ्यांनी काढला कॅन्डल मार्च..

 

सातारा दि: साताऱ्यातील नामांकित अशा कन्या शाळेच्या आवारात कबड्डी खेळताना अनाथ असलेल्या अक्षदा देशमुख या मुलीचा मृत्यू झाला. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी. यासाठी साताऱ्यातील महाविद्यालयीन विद्यार्थिनी व सामाजिक कार्यकर्ते महेश शिवदास यांनी साताऱ्यात कॅण्डल मार्च काढून लाडक्या बहिणीसाठी न्यायाची ज्योत पेटवावी अशी मागणी केलेली आहे.
याबाबत माहिती अशी की साताऱ्यातील कन्या शाळा येथील विद्यार्थिनी अक्षदा देशमुख हिचा खेळताना अकरा डिसेंबर रोजी शाळेच्या आवारातच मृत्यू झाला होता. सदर अक्षदा देशमुख ही गरीब व अनाथ असल्यामुळे या प्रकरणाकडे फारसं गांभीर्याने पाहिले गेले नाही. उलट याबाबत आवाज उठवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते महेश शिवदास यांनी प्रयत्न केला असता त्यांना नजर कैदेत ठेवून त्यांच्या समोरच आमची तक्रार नाही. असे पालकांकडून लिहून घेतल्याचा प्रकार घडला आहे. दबाव आणला जात असल्याचा आरोप श्री शिवदास यांनी केला सदर अक्षदा चे मूळ गाव हे चिकणेवाडी लवंगर तालुका सातारा येथील असून सदरची अक्षदा ही दहावी येथे शिकत होती. उपजीविकेसाठी खानावळ मध्ये चपाती करण्याचं काम करत होती.
या प्रकरणाबाबत माध्यमिक विभागाच्या शिक्षणधिकाऱ्यांनी तातडीने अहवाल सादर करावा. असा लेखी आदेश देऊन सुद्धा अद्यापही संस्थेने अहवाल सादर केला नाही.
सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप करण्यात आला. ज्यावेळी अक्षदा देशमुख अस्वस्थ झाली होती. त्यावेळेला शाळेत तिच्यासोबत असलेल्या काही मैत्रिणीने कुठेही वाचन करू नये. असा त्यांच्यावर शाळा प्रशासनाच्या वतीने दबाव आणला जात असल्याचाही आरोप होत आहे. दरम्यान, याबाबत सदर प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून महिला आयोगाच्या राज्य अध्यक्षा सौ रूपाली चाकणकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलेले आहे. तसेच दि: २४ डिसेंबर रोजी सातारा शहरात कॅन्डल मार्च काढल्यानंतर या प्रकरणाची सातारा शहरात चांगलीच चर्चा रंगू लागलेली आहे. सर ,मला दवाखान्यात का नाही नेले? ढीगभर आश्वानासापेक्षा टिचभर मदत महत्त्वाचे आहे. असे फलक विद्यार्थ्यांनी घेऊन राजवाडा ते कन्या शाळा असा सायंकाळी कॅन्डल मार्च काढला. लाडक्या बहीण योजनेचे सर्वच कौतुक करतात. परंतु, लाडक्या बहिणीच्या मृत्यूबाबत मौन धारण केल्यामुळे नवल व्यक्त केले जात आहे. सातारा शहरात अनेक महिला संघटना आहेत. त्यांनी जर आवाज उठवला तर सत्य परिस्थिती जनतेसमोर येणार आहे. त्यामुळे या प्रकरणात विरोधी पक्षाकडून अपेक्षा नाही परंतु सत्ताधारीच काही महिला पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. अशी मागणी विद्यार्थ्यां संघटनांनी केलेली आहे. दरम्यान याबाबत कन्या शाळेशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.
—————————————-&—&
फोटो -अक्षदा देशमुखच्या न्यायासाठी निघालेला कॅन्डल मार्च

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button